Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday, 22 March 2021

सयाजीराव गायकवाड

 दिनांक- १७ मार्च



 सुविचार - • मनाला उचित विचारांची सवय लागली की उचित कृती आपोआप घडते. - म. गांधी. 

कथाकथन - सयाजीराव गायकंवाड' : (जन्म १७ मार्च १८६३, मृत्यू फेब्रु. ९९३९) हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा असं ज्यांच यथार्थ वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले. त्या प्रजाहितदक्ष, ज्ञानोपासक व समाजसुधारक सयाजीराव गायकवाडाचा जन्य नाशिक जिल्ह्यातील कवळाणे गावी झाला. सयाजीरावांचे मूळ नाव गोपाळ. ते त्या गावच्या काशीराम गायकवाडांचे द्वितीय पुत्र. पण, बडोद्याचे दिवंगत राजे खंडेराव गायकवाड यांच्या पत्नी जमनाबाई यांनी घराण्यातल्या एखाद्या चांगल्याशा मुलाला दत्तक घ्यायचे ठरविले आणि अशा काही मुलांना बडोद्यास आणवून त्यांना विचारले, 'तू इथे कशासाठी आला आहेस?' त्या त्यांच्या प्रश्नाला फक्त गोपाळनेच उतर दिले. 'बडोद्याचा राजा होण्यासाठी या व इतर प्रश्नांना त्याने दिलेली समर्पक उत्तरे ऐकून जमनाबाई प्रभावित झाल्या आणि त्याची निवड होऊन दि. २७ मे १८७५ रोजी दत्तक समारंभ झाला व गोपाळ हा बडोदे संस्थानचा भावी राजा सयाजीराव खंडेराव गायकवाड बनला. बडोद्याचे दिवाण सर.टी. माधवराव यांनी सयाजीराव हे आदर्श राज्यकर्ते शिक्षण दिले व मूळच्या बुध्दिवान नव्हावे या दृष्टीने योग्य शिक्षकांकरवी त्यांना आवश्यक ते सर्व असलेल्या सयाजीरावांनी ते भराभर ग्रहण केले. दरम्यान, त्यांचा विवाह चिमनबाईशी झाला. त्याच्या अठराव्या वर्षी त्यांना राज्याभिषेक झाला व त्यांनी राज्याचा कारभार आपल्या हाती घेतला. राजपद स्वीकारताच त्यांनी उत्पन्नाची नवनवीन साधने शोधून काढून अवघ्या तीन-चार वर्षांत राज्याला असलेले जुने कर्ज फेडले व सरकारी तिजोरीत दीड कोटी जमा केले. स्वतंत्र शिक्षण खाते, वैद्यकीय खाते, महाविद्यालय यांची स्थापना करून हरिजनांसाठी खास शाळा व वसतिगृहे काढली. बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयकृत बँकेचे ते संस्थापक आहेत. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. गरीब पण बुध्दिमान मुलांना शिष्यवृत्या दिल्या. प्रत्येक गावात ग्रंथालय काढले. प्राचीन उत्तमोत्तम ग्रंथांच्या प्रकाशनासाठी स्वतंत्र संस्था काढली. मिश्रविवाहाला मान्यता, अटळ परिस्थितीत घटस्फोटाला मान्यता, कन्याविक्रय बंदी, स्त्रियांना वारसाहक्क, बुरखाबंदी, बालविवाह बंदी, अस्पृश्यता बंदी असे फ अनेक लोककल्याणकारी कायदे करून राज्ययंत्रणेत खालपासून वरपर्यंत शिस्त आणली. प्रगत अशा परदेशात प्रवास करून ज्या-ज्या देशात त्यांना विशेष चांगले असे दिसले, ते-ते आपल्या राज्यात आणण्याची पराकाष्ठा केली. हिदूंमधील विषमता दूर व्हावी म्हणून कुठल्याही जातीच्या माणसाला पौरोहित्य शिकण्याची व परीक्षा देऊन तो व्यवसाय करण्याकरिता सनद मिळविण्याची व्यवस्था केली. त्यांचे राष्ट्रीय नेत्यांशीच नव्हे, तर जगातील अनेक राष्ट्रांच्या नेत्यांशी स्नेहसंबंध होते. त्यांचा मुंबईत मृत्यू झाला.


दिनविशेष

- विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मृतीदिन - १८८२ : विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा जन्म पुणे येथे २० मे १८५० रोजी झाला. साहित्यातून विचारजागृती करण्यात आणि अध्ययन अध्यापन करण्यात त्यांनी आपली उभी हयात वेचली. विष्णुशास्त्रींच्या लेखणीत विलक्षण सामर्थ्य होते. युवा पिढीत स्वत्व, स्वाभिमान जागृत करण्याचे काम आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने त्यांनी केले. सरकारी नोकरीचा त्याग करून निबंधमालेच्या रूपाने सद्विचार पेरण्याचे महान कार्य त्यांनी केले. आपल्या लेखणीच्या फटकाऱ्याने व प्रखर ज्वलंत विचारांनी साऱ्या समाजाला त्यांनी खडबडून जागे केले. इंग्रजांचे अंधानुकरण अणि दडपशाहीमुळे अंगी मुरलेली लाचारी यामुळे समाज पोखरला गेला होता. या समाजाला खडबडून जागे करण्याचे काम त्यांच्या निबंधमालेने केले. समाजाला बहुश्रुत करण्याचा, अनुभवसंपन्न करण्याचा प्रयत्न त्यांनी केसरी, मराठा आणि निबंधमालेच्याद्वारे केला. अवघ्या ३२ वर्षाच्या जीवनात त्यांनी मराठी साहित्यक्षेत्रात, समाजजीवनात मौलिक कामगिरी केली; १७ मार्च १८८२ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.


सामान्यज्ञान 

 •विविध प्रकारची पाने, फुले, फळे आणि मध हे सर्व एकत्र चघळून, चावून त्याच्या मिश्रणाचे लाडू वानर तयार करतात রवन झाडांच्या ढोलीत ठेवतात आणि अन्न टंचाईच्या काळात आपल्या पिलांसाठी वानर या लाडवांचा उपयोग करतात.

No comments:

Post a Comment