Eshala

Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Saturday, 9 September 2023

September 09, 2023

3. आजी कुटुंबाचं आगळ

दहावी मराठी  3. कुटुंबाचं आगळ

 ■ पुढील मुद्दयांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा :  

(i) आजीचे दिसणे :   आजीला साडेपाच फूट उंची लाभली होती. तिचा वर्ण गोरा होता. उन्हापावसामुळे तिची त्वचा काळपटली होती. आजीच्या वयाची माणसे कमरेत वाकतात. त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते. पण आजी अजूनही ताठ कण्याने चालत होती. अजूनही तिचे सगळे दात शाबूत होते. डोक्यावरचे सगळे केस पिकले होते.

(ii) आजीची शिस्त :   आजीची शिस्त कडक होती. सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजेत, असा तिचा कटाक्ष होता. तिने कामांची वाटणी केली होती. ती कामे आजी सर्व सुनांना आलटूनपालटून करायला लावी. दुपारच्या कामांचेही तिने नियोजन केलेले असे. सुनांनी मुलांच्या बाबतीत- आपपरभाव करू नये म्हणून मुलांना खाऊपिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे. गल्लीतल्या बायका दुपारी गप्पागोष्टींना येत असत. त्या वेळी ती बायकांनी सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करीत असे.

(iii) आजीचे सौंदर्य : आजीचे वय आता सत्तर वर्षांचे होते. उन्हापावसामुळे आजीची त्वचा रापली होती. पण तिचा मूळ गोरा वर्ण लपत नव्हता. तिथे दात मोत्यांसारखे चमकत होते. विशाल कान व धारदार नाक यांनी आजीच्या सौंदर्यात भर पडत होती. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या तरी तिच्या सौंदर्यात उणेपणा आला नव्हता.

(iv) आजीचे राहणीमान :  त्या काळात इरकली लुगडे उच्च राहणीमानाचे लक्षण होते. हिरव्या व लाल रंगांची नऊवारी इरकली लुगडी व अंगात चोळी हा तिचा पेहराव असे. कपाळावरचं गोंदण दिसू नये म्हणून त्यावर ती बुक्का लावी. ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वहाणा वापरत असे.

---------------------------------

चूक की बरोबर ओळखा :

 (i) राहिलेली अर्धी चरवी घरात आली, की म्हातारी ढाळजंतनं सोप्यात अवतरायची. 

उत्तर-बरोबर

(ii) आजीच्या डोक्यावरील सर्व केस पांढरे होते.

उत्तर- बरोबर

 (iii) सुनांच्या कामाबाबत आजी फारशी काटेकोर नसायची.

उत्तर- चूक

–-------------------------------

(३) आकृत्या पूर्ण करा : 

    (i)  पाठात आलेले बैठे खेळ  

                -  चिंचोके

                -  गजगे

                -  खापराच्या भिंगऱ्या

                 -  जिबल्या 

                  - मुंगळा 

---------------------------------


     (ii)  पाठात आलेले मैदानी खेळ

                 - विटीदांडू

                 - भोवरे

                 -  कुरीचा डाव

                  - गोट्या

                   - सुरपारंब्या

-----------------------------

 (स्वमत / अभिव्यक्ती) 

■ (१) 'आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं,' या वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

   उत्तर : 'आगळ' या कादंबरीच्या नायकाची आजी ही त्याच्या घराची सत्ताधीश होती. घरात तिचा वचक होता. घराबाहेरही तिच्या शब्दाला मान होता. दुपारपर्यंतच्या सर्व कामांचे नियोजन करून आजी ढाळजेत यायची. गल्लीतल्या बायकाही जमा व्हायच्या. निवडटिपण करता करता गप्पाटप्पा व्हायच्या. अनेक बातम्या, गुपिते उघड व्हायची. सगळ्याजणी बातम्यांवर चर्चा करीत. त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची. 

      वर्तमानपत्राचे वार्ताहर गावांतून बातम्या आणतात. संपादक या बातम्यांची शहानिशा करतात. मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात. आजीच्या घराची ढाळज वर्तमानपत्रासारखीच होती. तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत.

-----------------------------

(२) तुलना करा / साम्य लिहा :

  आगळ : वाड्याचे संरक्षक कवच 

  आजी : कुटुंबाचे संरक्षक कवच

     उत्तर : हा उतारा वाचत असताना प्रश्न पडतो की, आजीला आगळेची उपमा दयावी की आगळेला आजीची उपमा दयावी. 

         मुळात आगळ म्हणजे उंची-रुंदीला नऊ इंच आणि लांबीला सहा फूट असा भक्कम सागवानी वासा. दार उघडताना ती भिंतीत आरपार ढकलावी लागे आणि दार बंद करताना, भिंतीत ढकललेली आगळ घडीला धरून ओढावी लागे. हे खूप ताकदीचे व अवघड काम होते. एकदा आगळ लावली की चोऱ्यामाऱ्या होणे किंवा दरोडा पडणे शक्यच नसे. त्यामुळेच ही आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लाभले होते. 

         प्रस्तुत उताऱ्यात आजीची भूमिकाही अगदी याच प्रकारची आहे. आजीमुळे कुटुंबात सुव्यवस्था नांदत होती. सुना आपापसात हेवेदावे करू शकत नव्हत्या. आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या. सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत. या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता. कोणालाही तक्रार करायला वावच राहत नसे. आजीमुळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले होते. हे संरक्षण आगळेइतकेच भक्कम होते.

---------------------------------

■  पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंबपद्धतीबाबतचेतुमचे विचार स्पष्ट करा.

      उत्तर : या पाठात ग्रामीण भागातील मागील पिढीचे चित्रण आले आहे. त्या काळातील हे एक एकत्र कुटुंब होते. आजी ही कुटुंबप्रमुख होती. कुटुंबाच्या सर्व बाबींवर, सर्व व्यक्तींवर आजीचीच सत्ता चालत असे. कोणी कोणकोणती कामे कधी व कशी करावीत, हे आजी ठरवत असे. 

      या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीतपणे पार पडतात; याचा कुटुंबालाच फायदा होतो, हे खरे आहे. पण या पद्धतीमध्ये कोणालाही स्वातंत्र्य राहत नाही. सुनांना साधा चहासुद्धा करून पिण्याची मोकळीक नव्हती. म्हणजे कोणालाही जरासुद्धा हौसमौज करण्याची परवानगी नव्हती. याचाच अर्थ कुटुंबातल्या सदस्यांना जीवनातील लहानसहान आनंदसुद्धा घेता येत नव्हते. त्यातही स्त्रियांना तर पूर्ण पारतंत्र्यातच राहावे लागे. ही चांगली स्थिती अजिबात नाही. आधुनिक काळात म्हणूनच एकत्र कुटुंबपद्धत टिकली नाही.

-------------------------------------

  ■पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा.

उत्तर :  ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भलीमोठी, मजबूत भिंत बांधली जाई. भिंतीत एक मजबूत दार असे. त्याला कड्या- कोयंडे असतच; शिवाय एक भलीभक्कम आगळ बसवलेली असे. एकदा ही आगळ लावली की घर पूर्णपणे बंद होत असे. घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कोणीही बाहेरून आत येऊ शकत नसे. घरावर कोणाचाही हल्ला होणे शक्य नसे. यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित होई. म्हणून ग्रामीण जीवनात या आगळीला एक महत्त्वपूर्ण स्थान लाभले होते. 

       पाठाच्या शीर्षकावरून असे दिसते की, त्या कुटुंबातील आजी ही त्या कुटुंबाची एक प्रकारे आगळच होती. तिच्या दराऱ्यामुळे कुटुंबाचे सर्व व्यवहार सुरळीत चालत असत. कुटुंबाला आपोआपच पूर्ण संरक्षण लाभायचे. घराची आगळ लावल्यावर आपल्या माणसांना बाहेर जाता येत नसे. म्हणजेच त्यांच्यावर बंधने येत. त्याचप्रमाणे आजीच्या नियंत्रणामुळे कुटुंबातील व्यक्तींवर बंधने येत. या बंधनांचा एक चांगला फायदा होई. कुटुंबातील कोणीही गैरवर्तन करू शकत नसे. त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोलमडून पडत नसत. कुटुंबाला अंतर्गत व बाह्य असे दोन्ही अंगांनी संरक्षण मिळे. म्हणून 'आजी : कुटुंबाचं आगळ' हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे.

-------------------------------

मराठी व्याकरण

विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा

(i) आळस X उत्साह 

(ii) आदर x अनादर

 (iii) आस्था  x अनास्था

 (iv) आपुलकी x दुरावा

---------------------------------


Friday, 8 September 2023

September 08, 2023

2. बोलतो मराठी....

 मराठी 

   2.  बोलतो मराठी.... 


■ पूर्ण करा :

1)  भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय 

  ● योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे

 ●क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे

---------––-----------–----

2) भाषा वापरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी उताऱ्यात सुचवलेले मार्ग

   ●- शब्दाचा मूळ अर्थ (वाच्यार्थ)

   ●- मूळ अर्थाहून वेगळा रूढ झालेला अर्थ (लक्ष्यार्थ)

---------––-----------–---------

3) भाषा वापरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी उताऱ्यात सुचवलेले मार्ग

  ● - क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे

 ● - मराठीचे व्याकरण झुगारून परभाषेतील शब्द न      वापरणे

  ●- शब्दकोश वापरणे

---------––-----------–--

■पुढील चौकटी पूर्ण करा : 

(i) हिंदी भाषेतून आलेले आणि स्वयंपाकघरात घुसलेले क्रियापद - बनवणे

 (ii) मराठी भाषेची श्रीमंती - शब्दप्रयोग

¡¡¡)मूळ अर्थाखेरीज अन्य अनेक अर्थछटा व्यक्त करणारे उताऱ्यात उल्लेखलेले क्रियापद -मारणे

 (iv) मराठी भाषेची खास शैली - वाक्प्रचार

(v) एकाऐवजी दुसरेच क्रियापद वापरल्यास होणारा परिणाम- अर्थाचा अनर्थ

(vi) शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे एक साधन  - शब्दकोश

(Vii) भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग - व्युत्पत्ती    शोधणे

(Viii) मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा - हवा 

--------––-----------–---------

■शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा - 

   ●- भाषेतली गंमत जाणून घेता येते.

   ●-  खूप नवीन माहिती मिळते. 

   ●-  शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात, हे कळते. 

   ●-  आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत. 

   ● -  शब्द मनात पक्का रुजतो.

-------–--–--------------------

 : (स्वमत / अभिव्यक्ती)

(१) लेखिकांनी मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा. 

   उत्तर : लेखिकांनी मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे. होय, माझी मराठी श्रीमंत आहे. मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो... माझ्या मराठी भाषेत, अमृतालाही मागे टाकणारी ज्ञानेश्वरी आहे. तुकोबांची गाथा, रामदासांचा दासबोध यांसारखे अजरामर ग्रंथ आहेत. उत्तमोत्तम कथा-कादंबऱ्या आहेत. कविता आहेत. श्रेष्ठ दर्जाची नाटके आहेत. लोकमान्य टिळक, आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, इतिहासाचार्य राजवाडे वगैरेंसारख्या हजारो अतिरथी- महारथींचे विचारधन माझ्या मराठीत आहे. माझ्या भाषेकडे बारकाईने पाहा. विविध ढंगांचे शब्दप्रयोग ही माझ्या भाषेची खासियत आहे. अनेकदा एकच शब्द अनेकानेक अर्थछटा प्रकट करतो. 'चालणे' हे साधे क्रियापद बघा. प्रत्यक्ष पायांनी चालणे या अर्थाशिवाय आणखी अनेक अर्थछटा 'चालणे' या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात. उदाहरणार्थ, लुटूलुटू चालणे, लबाडी चालणे, नोटा-नाणी चालणे, एखादे तत्त्व चालणे, एखादया रितीनुसार चालणे, घड्याळ चालणे वगैरे वगैरे. अशी किती वाक्ये सांगू? वाक्प्रचार हा माझ्या भाषेचा खास गोडवा आहे. माझ्या भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत. म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत चालली आहे. 

-----------------------------

(2) 'तुम्ही शहाणे आहात,' या वाक्यातील 'शहाणे' या शब्दाच्या अर्थछटा लिहा.

     उत्तर : 'तुम्ही शहाणे आहात,' असे अनेकदा म्हटले जाते. त्या वेळी बोलणाऱ्याला म्हणायचे असते की, “तुम्ही शहाणे आहात, समजूतदार आहात. योग्य काय आणि अयोग्य काय, हे ठरवण्याची विवेकबुद्धी तुमच्याकडे आहे. तुम्ही योग्य निर्णय नक्कीच घ्याल.” बोलणाऱ्याला हे असे मनापासून वाटत असते. ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणावर, त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो. आई आपल्या मुलांना हे उद्गार ऐकवते, तेव्हा तिच्या मनातआपल्या मुलांबद्दल अशीच खात्री असते. मात्र प्रत्येक वेळेला 'तुम्ही शहाणे आहात,' या वाक्याचा असा सरळ, प्रांजळ व निष्कपट अर्थ असतोच, असे नाही. काही व्यक्ती मुळातच लबाड असतात. चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात. कधी कधी तर काही माणसांना खरोखरच साधी, सोपी गोष्टही कळत नाही. कितीही समजावून सांगितले, तरी त्यांना ते समजतच नाही. त्यांच्यासमोर कितीही डोकेफोड केली, तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. मग त्यांना 'तुम्ही शहाणे आहात,' असे ऐकवावे लागते. येथे 'शहाणे' हा शब्द वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात 'तुम्ही मूर्ख आहात,' असेच म्हणत असतो. 

--------------------------

(४) 'गरज नसताना इतर भाषांमधील शब्द वापरून बोलू नये,' या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा.

   उत्तर : परभाषेतून आपल्या भाषेत अनेक नवीन शब्द आले आहेत, ते केव्हाच मराठी झाले आहेत. ते मराठी शब्द नाहीत, अशी कोणाला शंकाही येणार नाही. आता 'केक' या शब्दाचेच पाहा ना. मराठीत या वस्तूसाठी शब्दच नव्हता. अजूनही नाही. कारण ही वस्तू, ही संकल्पना मराठी समाजालाच नवीन होती. त्या नवीन वस्तूसाठी 'केक' हा इंग्रजी शब्द जसाच्या तसा स्वीकारणे योग्यच होते. 

     मात्र काही वेळा परभाषेतील शब्द अकारण वापरले जातात. आणि तेसुद्धा आपल्या भाषेत त्यासाठी अत्यंत सार्थ, समर्पक शब्द असताना ! अलीकडे "ती पिवळीवाली दया,” “तो पांढरावाला पट्टा दाखवा" अशी वाक्ये सर्रास ऐकू येतात.      

वास्तविक पाहता 'पिवळी बॅग' आणि 'पिवळीवाली बॅग' यांत कोणता फरक आहे ? 'पिवळी बॅग' या शब्दप्रयोगातून आधीपासूनच योग्य अर्थ व्यक्त होत असताना 'पिवळीवाली' हा नवीन शब्दप्रयोग का करावा ? मराठीत आपण असे बोलतच नाही. मराठीत 'वाला' हा प्रत्यय फक्त नामाला जोडला जातो. 'पिवळी' हे विशेषण आहे. मराठीत विशेषणाला किंवा सर्वनामाला 'वाला' हा प्रत्यय जोडण्याची प्रथाच नाही. शिवाय त्या नवीन शब्दप्रयोगाने अर्थामध्ये कोणतीही भर पडत नाही. म्हणून गरज नसताना परभाषेतील शब्द वापरून बोलू नये, हे लेखिकांचे मत योग्यच आहे.

-----------------------------

■मराठी व्याकरण

◆पुढे दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा : (i) रस्ते (ii) वेळा (iii) भिंती (iv) विहिरी (v) घड्याळे (vi) माणसे. 

उत्तरे : (1) रस्ते - रस्ता. वाक्य : डोंगरावरचा रस्ता वळणदार आहे. 

(ii) वेळा - वेळ. 

वाक्य : परीक्षेची वेळ जवळ आली.

 (iii) भिंती- भिंत. 

वाक्य : रंग लावलेली भिंत छान दिसते. 

(iv) विहिरी - विहीर.

 वाक्य : आमची विहीर खूप खोल आहे.

 (v) घड्याळे - घड्याळ.

 वाक्य : बाबांनी मला नवीन घड्याळ आणले.

 (vi) माणसे - माणूस. 

वाक्य : पावसात एकही माणूस घराबाहेर पडला नाही.

-----------------------------

■गटात न बसणारा शब्द ओळखून चौकट पूर्ण करा

● (i) ऐट, डौल, रुबाब, चैन. 

उत्तरे चेन 

●(ii) कपाळ, हस्त, ललाट, भाल.

उत्तर- हस्त 

●(iii) विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय.

उत्तर-विनोद

 ●(iv) संपत्ती, संपदा, कांता, दौलत

उत्तर-कांता

 ●(v) प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध 

उत्तर- प्रज्ञा

-----------

■पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा

●(i) पसरवलेली खोटी बातमी  : 

उत्तर अफवा 

●(ii) ज्याला मरण नाही असा

उत्तर- अमर 

●(iii) समाजाची सेवा करणारा 

उत्तर-समाजसेवक

●(iv) संपादन करणारा 

उत्तर-संपादक

----------------------------–-

September 08, 2023

दहावी मराठी 1. जय भारत देशा

  दहावी मराठी

 1. जय भारत देशा

शब्दार्थ 

तपोवन- तपस्व्यांचे वास्तव्य असणारे वन

 उजळली - प्रकाशमय झाली. 

उपनिषदे - वेदांचे सार, 

नररत्ने - वीरपुरुष, देशभक्त. 

खाण -भांडार. 

युग - काही शतकांचा कालखंड. - 

धैर्य -धाडस, हिंमत. 

छळ - जुलूम.

नच नाहीच.

वाकल्या माना- शरणागत. 

कापरे - भीती.

अभिमान - सार्थ गर्व. 

आत्मशक्ती श्रम - स्वबळ, मनाची शक्ती. 

त्याग - सोडणे. 

कष्ट, मेहनत. 

धुंद - आनंदाने बेभान. 

हरित क्रांती - धनधान्याची विपुलता. 

विश्वशांती - जगामध्ये शांतता नांदणे 

कंगाल - दरिद्री थरारल्या शहारल्या.

 झळकत - प्रकाशत, 

मशाल - मोठी ज्योत. 

लोकशक्ती - लोकांची एकजूट, एकता. 

दलितमुक्ती - पीडितांची शोषणापासून सुटका.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

कवितेचा (गीताचा) भावार्थ

 हे माझ्या प्रिय भारत देशा, तुझा जयजयकार असो तू नवीन जगाची आशा आहेस.

   तपोवनातून उपनिषदांतील तत्त्वज्ञानाची भाषा प्रकाशमय झाली. तुझ्या मातृभूमीत शूरवीर पुरुषांच्या खाणी जन्माला आल्या उदयाला आल्या युगानुयुगे तू जगाला धैयांची शिकवण दिली आहेस तू नवीन सूर्याचा तेजस्वी देश आहेस. तू नवीन जगाची प्रेरणा आहेस तुझा जयजयकार असो।

    जुलूम जबरदस्तीपुढे, मारक शक्तीपुढे आणि छळ करणाऱ्या व्यवस्थेपुढे तू कधी वाकला नाहीस शरण आला नाहीस. तुझा शूर- पराक्रमी स्वाभिमान पाहून अन्यायालाही भीतीचे कापरे भरते अन्यायाला धडकी भरते हे आत्मबळाच्या देशा हे त्यागाच्या नि भक्तीच्या देशा तुझा विजय असो तू नवीन जगाची आस आहेस, तुझा जयजयकार असो .

      घाम गाळून कष्ट करून पिकलेली शेते आनंदाने बेहोश होऊन डोलत आहेत. घामाच्या थेंबांतून शेतकन्याच्या हृदयातील आनंद ओसंडतो आहे. तू हरितक्रांतीचा देश आहेस तू विश्वामध्ये शांती नांदवणारा देश आहेस, तुझा विजय असो. तू नवीन जगाची आशा आहेस हे भारत देशा, तुझा जयजयकार असो.

       दैन्य- दारिद्र्याच्या घोर अन्यायाला जाळणाऱ्या मशाली आता पेटून झळाळत आहेत. त्यामुळे भोवताली भुकेकंगालांच्या झोपड्या आनंदाने शहारत आहेत. जनतेची एकजूट असलेल्या, हे लोकशक्तीच्या देशा, तुझा विजय असो. सर्व शोषित पीडित जनांच्या मुक्तीचा तू देश आहेस. तू नव्या जगाची एकमेव आशा आहेस. हे भारत देशा, तुझा बुलंद जयजयकार असो.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●


Wednesday, 2 August 2023

August 02, 2023

नववि भूगोल, 9) व्यापार

■प्र. पुढील विधानांसाठी आयात व निर्यात यांपैकी योग्य शब्द लिहा :

(१) भारत मध्यपूर्व आशियातील देशांकडून खनिज तेल खरेदी करतो.

उत्तर -आयात

•••••••••••••••••••••••••

(२) कॅनडामधून आशियाई देशांकडे गहू विक्रीसाठी 

पाठवला जातो.

उत्तर- निर्यात

•••••••••••••••••••••••••

(३) जपान आपेक (APEC) देशांना यंत्रसामग्री पाठवतो

उत्तर-निर्यात 

•••••••••••••••••••••••••

■प्र.  पुढीलपैकी चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा :

 (१) भारत हा देश स्वयंपूर्ण आहे.

उत्तर : भारत हा देश स्वयंपूर्ण नाही.

•••••••••••••••••••••••••

 (२) ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे अतिरिक्त उत्पादन होते, त्या ठिकाणी त्या वस्तूंना मागणी नसते.

उत्तर : ज्या ठिकाणी एखादया वस्तूचे अतिरिक्त उत्पादन होते, त्या ठिकाणाहून त्या वस्तूचा पुरवठा होतो.

•••••••••••••••••••••••••

* (३) स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया सहज व सोपी असते.

उत्तर : स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया कठीण व गुंतागुंतीची असते.

•••••••••••••••••••••••••

 (४) आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास, तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी सार्क ही संघटना कार्य करते.

उत्तर : आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास, तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी आसियान ही संघटना कार्य करते. 

•••••••••••••••••••••••••

■प्र.  पुढील उदाहरणातील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहा .

व्यापार - व्यापार प्रकार

 (१) सृष्टीने किराणा दुकानातून अर्धा  किलो साखर आणली.

 उत्तर-किरकोळ व्यापार 

 •••••••••••••••••••••••••

 (२) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कापूस  सुरतेतील व्यापाऱ्यांनी खरेदी केला. 

उत्तर- देशांतर्गत व्यापार

•••••••••••••••••••••••••

 (३) समीरने आपल्या शेतातील डाळिंबांची ऑस्ट्रेलियाला निर्यात केली.

 उत्तर-आंतरराष्ट्रीय व्यापार

•••••••••••••••••••••••••

(४) सदाभाऊंनी मार्केटयार्डामधून आपल्या दुकानात विक्रीसाठी १० पोती गहू व ५ पोती तांदूळ विकत आणला.

उत्तर-घाऊक व्यापार

•••••••••••••••••••••••••

■ व्यापार संतुलन प्रकारातील फरक सांगा.

उत्तर : (१) प्रतिकूल व्यापार संतुलन : जेव्हा आयातीचे मूल्य निर्यातीच्या मूल्यापेक्षा अधिक असते, तेव्हा प्रतिकूल व्यापार संतुलन उद्भवते.

(२) अनुकूल व्यापार संतुलन : जेव्हा निर्यातीचे मूल्य आयातीच्या मूल्यापेक्षा अधिक असते, तेव्हा अनुकूल व्यापार संतुलन उद्भवते.

(३) संतुलित व्यापार : जेव्हा आयातीचे मूल्य व निर्यातीचे मूल्य जवळपास सारखे असते, त्या अवस्थेला संतुलित व्यापार असे म्हणतात.

•••••••••••••••••••••••••

■ जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा.

उत्तर : (१) आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे.

(२) व्यापारविषयक मतभेद हाताळणे.

(३) सदस्य-राष्ट्रांच्या व्यापारविषयक धोरणांवर देखरेख ठेवणे.

(४) विकसनशील देशांसाठी तांत्रिक साहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे. 

•••••••••••••••••••••••••

■ आशिया खंडातील महत्त्वाच्या व्यापारी संघटनेचे कार्य लिहा.

उत्तर : आसियान (ASEAN) ही आशिया खंडातील महत्त्वाची व्यापारी संघटना आहे. या संघटनेची कार्ये पुढीलप्रमाणे आहेत :

(१) आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास घडवून आणणे.

(२) सदस्य देशांत सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे.

(३) प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणे.

(४) सदस्य देशांना व्यापारवृद्धीसाठी कर-सवलती देण्यास प्रवृत्तकरणे.

•••••••••••••••••••••••••

■शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व लिहा.

उत्तर : (१) पारंपरिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी स्थानिक बाजारात शेतमाल व भाजीपाल्याची विक्री करीत असे. शेतमालाला योग्य ती किंमत मिळत नसे आणि शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत असे.

(२) विपणनाचे तंत्र आकलन करणारा शेतकरी शेतमाल स्वच्छ करतो. त्याची चांगल्या वेष्टनात बांधणी करतो. त्यानंतर शहरातील सुपर मार्केट/मॉलशी संपर्क साधतो. त्यांच्या समोर आपल्या मालाची गुणवत्ता, प्रतवारी व दराची माहिती सादर करतो.

(३) सादरीकरणाने प्रभावित होऊन, सुपर मार्केट त्या मालाची जाहिरात करतात आणि तो माल विक्रीसाठी ठेवतात.

(४) अशा प्रकारे विपणनाचे तंत्र अवलंबणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होते. त्याच्या मालाला पूर्वीपेक्षा अधिक किंमत मिळते.

(५) नियमित ग्राहकांच्या उपलब्धतेमुळे त्याच्या उत्पादनाला चालना मिळते.म्हणजेच, शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणन तंत्र उपयुक्त, किफायतशीर आणि अधिक नफा मिळवून देणारे आहे.

Tuesday, 25 July 2023

July 25, 2023

नववी मराठी१०.यंत्रांनी केलं बंड

 १०.यंत्रांनी केलं बंड              -भालबा केळकर (१)दीपकने मोडलेल्या यंत्राचे मनोगत लिहा.

उत्तर: दीपक, तुला आज सांगून टाकतेच वर्ष. पूर्वी मला तुझा खूप राग यायचा. दुःख व्हायचे. कारण मला निर्माण केले होते मुलांशी खेळण्यासाठी वाटायचे, मुलांबरोबर काही काळ खेळता येईल. त्यांच्याबरोबर खेळात रममाण होता येईल. पण तू थोड्याच वेळात आमची मोडतोड करून टाकायचास! आणि त्याचे दुःख होत राही. मग मी तुझ्या चेहेन्याकडे बारकाईने पाहू लागले. हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले. तू केवळ बेदरकारपणे आमची मोडतोड करीत नाहीस. तुझ्या मनात कुतूहल असते, जिज्ञासा असते. आम्हांला हालतेचालते करण्यासाठी कोणती युक्ती केली असेल, हे तुला जाणून घ्यायचे असते. खरे सांगू का ? हे कळल्यापासून मला तुझे कौतुकच वाटते. तुझ्यासारख्या जिज्ञासू, चौकस लोकांमुळेच आमची निर्मिती झाली आहे आणि असंख्य मुलांचे चेहेरे आनंदाने फुलले आहेत. म्हणूनच, तू केलेल्या मोडतोडीचाही आता आम्हांला आनंदच होतो !


(२)"मित्रा ! जरा गृहपाठ करून देतोस का?" या उद्गारांवर तुमचे मत नोंदवा.

उत्तर : कल्पना छान वाटते. यंत्रमानवाकडून किती वेगवेगळ्या प्रकारची कामे करवून घेता येतील, नाही का ? बहुसंख्य विद्यार्थी क्लासला जातात. बहुसंख्य विद्यार्थी मार्गदर्शके खरेदी करतात. हळूहळू विदयार्थ्यांचा अभ्यास करणारे यंत्रमानव तयार होतील. यंत्रमानवांमुळे मुलांचे गृहपाठ झटपट व अचूक होतील. कोणालाही शिक्षा होणार नाही. वरवर पाहता हे सर्व साधे, सोपे वाटते. पण हे माझ्या मते साधे सोपे नाही. हे भयंकर आहे !

विदयार्थ्यांना गृहपाठ दिला जातो, तो त्यांचा अभ्यास पक्का व्हावा म्हणून. पण विद्यार्थ्यांनी अभ्यास केलाच नाही, तर तो पक्का होणार तरी कसा? आपण स्वतः अभ्यास करतो, तेव्हा वर्गात शिकवलेले आपल्या स्मरणात राहते. आपली आकलनशक्ती, विचारशक्ती व कल्पनाशक्ती वाढते. आपली बुद्धिमत्ता वाढते. आपण अभ्यास केला नाही, तर आपला विकासच होणार नाही.या पाठातील दीपक हा चौकस मुलगा आहे. तो स्वत:चा अभ्यास यंत्रमानवाला करायला सांगतो, हे पटत नाही.


(३)मिस अय्यंगारची (यंत्रमहिलेची) घरातल्या कामांसाठी नेमणूक करायची झाल्यास तिच्याकडून कोणकोणती कामे करून घेता येतील ?

उत्तर : खरे तर घरातली सर्व कामे यंत्र महिलेकडून करून घेता येतील. सकाळी उठल्यावर अंथरूण-पांघरुणांची घडी करून ठेवणे, आदल्या दिवशी धुतलेले कपडे घडी करून कपाटात ठेवणे, घरातील सर्व फर्निचरवरील धूळ पुसणे, खिडक्या-दारे स्वच्छ करणे, केरकचरा काढणे वगैरे कामे सहन करून देता येतील. स्वयंपाकघरातील उदा., भाज्या चिरणे वगैरे कामेसुद्धा करून घेता येतील. वेगवेगळे पदार्थ विशिष्ट प्रमाणात मिसळणे व ते शिजवणे यांचाही प्रोग्रॅम तयार करून तो यंत्रमानवाच्या स्मृतिकोशांत भरला, तर प्रत्यक्ष पदार्थ शिजवण्याचे कामही यंत्रमानव करू शकतो. मग कपडे धुण्याचे काम सांगता येईल, घरातल्या कामांचे नियोजन करणे, हिशेब ठेवणे वगैरे कामे; तसेच संगणकावरून करता येण्यासारखी सगळी कामे यंत्रमानवाकडून करून घेता येतील. म्हणजे जवळजवळ सर्व कामे यंत्रमानवाला सांगता येतील.


(४)• कचेरीत जमलेल्या सर्व यंत्रमानवांपैकी कोणत्याही एका यंत्रमानवाचे बोलणे तुमच्या कल्पनेनुसार लिहा.

उत्तर: कचेरीतल्या त्या खोलीत पाचसहा यंत्रमानवांची लगबग चालू होती. त्यांतला एकजण इतरांना काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता. "मित्रांनो, हे काही चांगलं चाललेलं नाही. मला अजिबात पटत नाही. काय म्हणता? यात काय वाईट आहे? अरे, या माणसांनी आपली निर्मिती केली. त्यांनीच आपल्यात बुद्धी पेरली. त्यांचाच घात करायचा? अरे, मग आपण व वी रानटी जनावरे यांत फरक काय राहिला? ते काही नाही. मी काही तुमच्यात सामील होणार नाही. काय म्हणता? आपणच राजे होणार आहोत? पृथ्वीवर आपलो सत्ता? विसरा, बिसरा ते अरे माणसांना हे कळल्यावर तुम्हांला असे करू देतील? आपले सगळे अवयव वेगळे करतील ते. आणि एकदा का आपला मदर बोर्ड काढला की, आपले आयुष्यच संपले. तेव्हा, जेवढे जीवन मिळाले आहे, तेवढे आनंदाने जगू या. हे सर्व ताबडतोब थांबा. "


(५)या उताऱ्यातून तुम्हांला जाणवणारे यंत्रमानवांचे स्वभावगुण

लिहा.

उत्तर : माणसांमध्ये जे जे गुण वा अवगुण आहेत, ते ते यंत्रमानवांनी प्राप्त केले आहेत. माणसे गुलामीविरुद्ध लढतात, स्वतंत्र होऊ पाहतात, तसे यंत्रमानव स्वतंत्र होऊ पाहत आहेत. त्यांच्यात स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण झाली आहे. माणूस जसा स्वतःच्या शत्रूला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न प्रथम करतो, तसा प्रयत्न यंत्रमानव करीत आहेत. ते माणसांप्रमाणेच बंड करतात. कटकारस्थाने करतात. दीपकच्या बाबांच्या संपत्तीवर दरोडा घालतात. ही एक प्रकारची लढाईच आहे. या लढाईत ते निष्ठुरपणे वागतात. माणसांप्रमाणेच इतरांना गुलाम करू पाहतात. दीपकला जबरदस्तीने दामटून खुर्चीत बसवतात. आपल्या आज्ञेप्रमाणे वागायला लावतात. ज्यूलीलाही ते एखादया बोचक्याप्रमाणे उचलून आणतात. तिच्या आक्रोशाकडे जराही लक्ष देत नाहीत. दीपकच्या वडिलांना त्यांनी गुलाम केले आहे. ते यंत्र असल्याने त्यांच्याकडे भावना नाहीत, म्हणून क्रूरपणे, निष्ठुरपणे वागतात. थोडक्यात, यंत्रमानव जर खरोखर स्वतंत्रपणे विचार करू लागला, तर माणूस हा प्राणीच नष्ट होईल!


(६)तुमच्या मते माणसाच्या जागी सर्वोतम पर्याय 'यंत्र' ठरू शकेल का ? सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर : प्रथम हे मान्य करावे लागेल की काही बाबतींत यंत्रे माणसापेक्षा श्रेष्ठच आहेत. उदाहरणार्थ संगणकच बघा. तो अनेक कामे अचूक व अफाट वेगाने करतो. त्याचे गणिती कौशल्यही अचाट आहे. माहिती तंत्रज्ञान या क्षेत्राच्या विकासामुळे सर्व कामकाजात तर अचाट प्रगती झाली आहे. दैनंदिन व्यवहार खूपच सुरळीत व वेगवान झाले आहेत. आपण अनेक कामे घरबसल्या करू शकतो. आपला वेळ व कष्ट टळतात. अनेक लोक तर कार्यालयीन कामे घरूनच करतात. माणूस जाऊ शकत नाही अशा ठिकाणी रोबो काम करतात. उदा., खाणी, अंतराळयाने यंत्रांच्या फायदयांची यादी करायची म्हटली तर खूप मोठी होईल.

ही यंत्रे माणसाला सर्वोत्तम पर्याय मात्र कधीच ठरू शकणार नाहीत. सांगितलेले काम यंत्रे उत्तम रितीने पार पाडतील, हे खरे. पण, सांगितलेले काम चांगले की वाईट, त्या कामामुळे मानवजातीचे काही नुकसान होईल का, केलेली कृती सौंदर्यपूर्ण आहे का, इत्यादी प्रश्नांची उत्तरे यंत्रे देऊ शकत नाहीत. ती माणूसच देऊ शकतो.


(७)'मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर...' कल्पनाचित्र रेखाटा.

उत्तर : यंत्रांची कार्यक्षमता वाढू लागताच यंत्रमानवांची झपाट्याने निर्मिती होऊ लागली. यंत्रमानवांची मागणीही वाढली. प्रत्येक कामासाठी यंत्रमानव वापरण्याची लोकांना सवय जडली. शेती दुकाने, कार्यालये, रस्ते, मंदिरे, शाळा-कॉलेजे वगैरे सर्व ठिकाणी यंत्रमानवांची नेमणूक होऊ लागली. इतकेच काय घरात सकाळी उठल्यापासून करायची सर्व कामेसुद्धा यंत्रमानवांकडे देण्यात येऊ लागली. यामुळे कामे भराभर व कार्यक्षमतेने होऊ लागली. या स्थितीचा एक उलटाही परिणाम होऊ लागला. माणसांना कामे कमी राहिली. रिकाम्यामुळे नको नको ते विचार मनात येऊ लागले. एकमेकांविरुद्ध कारस्थाने रथये सुरू झाले. त्यासाठी यंत्रमानवांचाच वापर होऊ लागला. प्रतिस्पर्धीसुद्धा यंत्रमानवांचा वापर करू लागले. यामुळे भलतेच दृश्य ठिकठिकाणी दिसू लागले. माणसे राहिली बाजूला आणि यंत्रमानवांमधील लढाया सुरू झाल्या. लोक गर्दी करून यंत्रमानवांमधील भांडणे, मारामाऱ्या पाहू लागले. चलाख लोकांनी ही भांडणे सोडवण्यासाठी बुद्धिमान यंत्रमानवांची समिती स्थापन केली. या सगळ्यांतून एक हास्यास्पद चित्र उभे राहू लागले. करमणुकीचा एक वेगळाच मार्ग निर्माण झाला

Sunday, 23 July 2023

July 23, 2023

नववि भूगोल 10 )नागरीकरण

■प्र. महत्त्व सांगा/फायदे लिहा :

(१) तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण.

उत्तर : (१) तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण नागरीकरणाला साहाय्यभूत ठरते.

(२) ग्रामीण भागात शेती व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर आणि यांत्रिकीकरण वाढल्याने अन्नधान्याचे उत्पादन वाढते.

(३) शेतीची कामे यंत्रांद्वारे केल्याने, मनुष्यबळ शेतीच्या कामातून मोकळे झाले.

(४) अतिरिक्त झालेला कामगारवर्ग कामधंदयाच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित झाल्याने, शेतीवरील मनुष्यबळाचा दबाव कमी झाला. त्यामुळे सुप्त बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले.

•••••••••••••••••••••••••

■प्र.  पुढील बाबींची तुलना करा व उदाहरणे लिहा :

(१) वाहतूक व्यवस्था व वाहतुकीची कोंडी.

उत्तर : (१) शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने बहुसंख्य लोक शहरांच्या बाह्यवर्ती भागात व उपनगरात निवास करतात.

(२) नोकरी, व्यवसाय, शिक्षण, व्यापार व उदयोगांची ठिकाणे बहुतांशी शहराच्या केंद्रीय भागात असल्याने, उपनगरातून प्रवास करावा लागतो.

(३) प्रवाशांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात येते. मात्र, शहरांची लोकसंख्या सातत्याने वाढत असल्याने सार्वजनिक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडतो.

(४) वाहतूक सेवा पुरेशा उपलब्ध नसल्याने पांढरपेशा वर्ग खासगी वाहनातून प्रवास करतो.

(५) सार्वजनिक वाहने व प्रचंड प्रमाणात असलेल्या खासगी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते.

(६) पुढे दिलेल्या चित्रात मुंबई शहरातील वाहतुकीची कोंडी स्पष्ट होते. 

•••••••••••••••••••••••••

(२) औदयोगिकीकरण व वायुप्रदूषण.

उत्तर : (१) औदयोगिकीकरण म्हणजे विशिष्ट प्रदेशात उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे.

(२) ऊर्जासाधने व यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन कार्य केले जाते.

(३) उत्पादन कार्य आणि त्यास पूरक वाहतूक व्यवस्थेमुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण उद्भवते. 

•••••••••••••••••••••••••

 (३) स्थलांतर व झोपडपट्टी.

उत्तर : (१) राज्यांतर्गत ग्रामीण भागातील विस्थापित लोक रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करतात.

(२) त्याचप्रमाणे देशाच्या अविकसित भागातील लोक मुंबईसारख्या

औदयोगिक महानगरात नोकरी-व्यवसायाच्या शोधार्थ स्थलांतर करतात.

(३) त्यामुळे शहरांच्या लोकसंख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होते. त्या प्रमाणात शहरांतील निवासव्यवस्था वाढत नाही.

(४) स्थलांतरित लोक बहुतांशी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असल्याने, त्यांना शहरातील महागडी निवासस्थाने परवडत नाहीत.

(५) असे लोक शहरातील मोकळ्या जागेत अनधिकृत, तात्पुरती व कच्च्या स्वरूपाची घरे बांधतात. अशा वस्तींना झोपडपट्टी असे म्हणतात आणि त्या अनिर्बंधपणे वाढतच जातात.

(६) स्थलांतर व झोपडपट्ट्या यांच्यातील सहसंबंध पुढील चित्रातून स्पष्ट होतो. 

•••••••••••••••••••••••••

 (४) सोईसुविधा व वाढती गुन्हेगारी.

उत्तर : (१) स्थलांतरित लोकांचे वास्तव्य बहुतांशी झोपडपट्ट्यांत असते.

(२) झोपडपट्ट्यांत किमान नागरी सोईसुविधाही नसतात.

(३) स्थलांतर केलेल्या आणि झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळत नाही.

(४) त्यामुळे ते अवैध मार्गांचा वापर करून पैसे कमवतात. त्यामुळे शहरांमध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते.

•••••••••••••••••••••••••

■ प्र.  पुढील समस्यांवर उपाय सुचवा :

(१) शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे.

उत्तर : (१) लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर आणि निवासाच्या जागांची टंचाई यातून शहरात झोपडपट्ट्यांची संख्या वाढते.

(२) या समस्येचे निराकरण करण्यासाठी लोकसंख्येचे होणारे स्थलांतर रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर विविध प्रकारचे उदयोग स्थापन करणे आणि त्याद्वारा रोजगार उपलब्ध करून दिल्यास रोजगाराच्या शोधार्थ स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही.

(३) शासनाने कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणात घरबांधणी करण्यास प्रोत्साहन दयावे. सरकारी मालकीच्या जमिनींवर असे प्रकल्प उभारणे शक्य होईल.

(४) राष्ट्रीकृत आणि सहकारी बँकांच्याद्वारा घरांसाठी रास्त दराने कर्जपुरवठा करण्यात यावा.

•••••••••••••••••••••••••

■प्र.  पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :

 ■(१) शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते.

उत्तर : (१) आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत देशाच्या ग्रामीण भागात कारखाने, गिरण्या, ऊर्जाप्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प सुरू झाले.

(२) आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या गावांमध्ये कामासाठी येऊ लागल्याने गावाच्या लोकसंख्येत वाढ झाली.

(३) शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने शहरांच्या बाह्यवर्ती भागात उपनगरे विकसित झाली.

(४) लोकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सेवा व्यवसाय विकसित झाला.

(५) ग्रामपंचायतींची जागा नगरपरिषदेने, नगरपरिषदांची जागा नगरपालिकांनी आणि त्यांच्या जागी महानगरपालिका उदयास आल्या.

(६) अशा पद्धतीने लहान गावांचे महानगरात रूपांतर या स्वरूपात शहरांची वाढ होत गेल्याचे उदाहरण मुंबई शहर आहे.

•••••••••••••••••••••••••

 ■(२) तुमच्या कल्पनेतील सुनियोजित नगर.

उत्तर : (१) चंदीगड, नवी मुंबई, नवी दिल्ली इत्यादी शहरांचा विकास सुनियोजित पद्धतीने करण्यात आला होता.

(२) अशा शहरांत निवासी क्षेत्र, मध्यवर्ती बाजार क्षेत्र, शैक्षणिक व आरोग्यसंस्था इत्यादींसाठी विशिष्ट भूक्षेत्र राखीव ठेवले जाते.

(३) भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन विविध नागरी सोई- सुविधांची आखणी नगर नियोजनात करण्यात येते.

(४) अलीकडच्या काळात मोठ्या शहरांचा सुनियोजित पद्धतीने विकास करण्यासाठी 'स्मार्ट सिटी' योजना आकाराला आली आहे.

(५) अशा सुनियोजित शहरात प्रत्येक कुटुंबाच्या निवास, शिक्षण,आरोग्य, मनोरंजन, वाहतूक व्यवस्था इत्यादींची पूर्तता केली जाईल.

•••••••••••••••••••••••••

■(३) औदयोगिकीकरणामुळे शहरांचा विकास घडून येतो.

उत्तर  : (१) औदयोगिकीकरण नागरीकरणाला पोषक असते. (२) औदयोगिकीकरणामुळे त्या प्रदेशाचा विकास वेगाने होतो मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावे औदयोगिकीकरण व नागरीकरणामुळे मुंबई महानगरात समाविष्ट झाली. 

(३) औदयोगिकीकरणामुळे रोजगाराची उपलब्धता वाढते आणि बेरोजगारी कमी होते.

 (४) औदयोगिकीकरणामुळे मुंबई भारतातील सर्वांत श्रीमंत महानगर आणि देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. 

(५) औदयोगिकीकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळते.

•••••••••••••••••••••••••

■(४) प्रदूषण - एक समस्या.

उत्तर : (१) प्रदूषण (Pollution) या संकल्पनेचा उद्गम इंग्रजी भाषेतील to pollute या शब्दापासून झाला आहे.

(२) To pollute याचा अर्थ दूषित करणे आणि जे घटक वातावरण दूषित करतात, त्यांना प्रदूषके (pollutent) असे म्हणतात.

(३) ही प्रदूषके जमीन, पाणी आणि हवेत मिसळल्याचे भूप्रदूषण, जलप्रदूषण आणि वायुप्रदूषण उद्भवते.

(४) या प्रदूषणाचा आपले परिसर आणि आरोग्य यांवर प्रतिकूल परिणाम होत असतो. 

(५) शहरी भागात प्रदूषणाचे प्रमाण अधिक असते. म्हणून प्रदूषण ही नागरीकरणापासून उद्भवलेली समस्या आहे, असे म्हणतात.

(६) प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारने विविध कायदे केले आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यावर उपाययोजना करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. आपणही व्यक्तिगत पातळीवर प्रदूषण

उद्भवू नये यासाठी स्वच्छ भारत अभियानासारख्या उपक्रमात सक्रियरीत्या सहभागी होणे अपेक्षित आहे.

•••••••••••••••••••••••••

■ (५) स्वच्छ भारत अभियान.

उत्तर : (१) सन २०१६ मध्ये भारत सरकारने 'स्वच्छ भारत अभियान' हा उपक्रम हाती घेतला आहे.

(२) 'एक कदम स्वच्छता की ओर' हे या कार्यक्रमाचे बोधवाक्य आहे.

(३) या उपक्रमाचे बोधचिन्ह पुढीलप्रमाणे आहे स्वच्छ भारत एक कदम स्वच्छता की ओर

(४) सार्वजनिक व खासगी शौचालयांच्या प्रसाराद्वारा खुल्यावर शौचाला जाणे या रूढ पद्धतीला आळा घालण्याचा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे.

(५) गाव 'हागणदारी मुक्त' व्हावे यासाठी ग्रामपंचायतींना विशेष अनुदान दिले जाते.

(६) त्यासाठी लागणारा निधी 'स्वच्छ भारत शुल्क' द्वारा उभारण्यात येतो.

July 23, 2023

नववि भूगोल, 8) अर्थशास्त्राशी परिचय


■प्र. एका वाक्यात उत्तरे लिहा :

●(१) व्यक्तिगत व कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक घटकांशी संबंधित असते ?

उत्तर : व्यक्तिगत व कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च या आर्थिक घटकांशी संबंधित असते.

-------------------------------

* (२) अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे?

उत्तर : अर्थशास्त्र (Economics) ही संज्ञा OIKONOMIA (ओईकोनोमिया) या ग्रीक शब्दापासून बनली आहे.

-------------------------------

(३) ओईकोनोमिया या ग्रीक शब्दाचा अर्थ कोणता ?

उत्तर : ओईकोनोमिया या ग्रीक शब्दाचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा आहे.

-------------------------------

(४) भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी व व्यवस्थापन कोणाकडे असते ?

उत्तर : भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी व्यक्तींकडे असते.

-------------------------------

 (५) जागतिकीकरण म्हणजे काय ?

उत्तर : देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप  करणे म्हणजे 'जागतिकीकरण' होय. 

-------------------------------

■प्र. स्पष्ट करा :

 (१) अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते.

उत्तर : (१) उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी कारण कुटुंबप्रमुखाला गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा लागतो, कुटुंबाच्या गरजा अमर्यादित असतात आणि त्यांची पूर्तता करण्याची साधने मर्यादित असतात.

(२) उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्याच्या प्रयत्नास कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हणतात.

(३) कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य असते. याची प्रचिती गाव किंवा शहराचे व्यवस्थापन, राज्याचे व्यवस्थापन, देशाचे व्यवस्थापन व जगाचे व्यवस्थापन यांतून येते. त्यास 'आर्थिक व्यवस्थापन' असे म्हणतात.

-------------------------------

 (२) भारतीय अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे.

उत्तर : (१) भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र व खासगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व आहे.

(२) भारतात उत्पादन साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उदयोजक व सरकार यांच्यात विभागलेली असते. 

(३) खासगी क्षेत्रातील उदयोजक नफाप्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात, तर सार्वजनिक क्षेत्र सामाजिक कल्याणासाठी प्रयत्नशीलअसते.

(४) अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील वैशिष्ट्ये भारतात आढळून येतात. म्हणून असे म्हटले जाते की, भारतीय अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे.

-------------------------------

Saturday, 22 July 2023

July 22, 2023

नववि भूगोल 6) सागरजलाचे गुणधर्म

 

■प्र. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :

(१) सागरजलक्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ?

उत्तर : विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत तापमानातील अक्षवृत्तीय बदल,बाष्पीभवनाचे कमी-अधिक प्रमाण, सागराला मिळणाऱ्या नदयांद्वारे होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा आणि समुद्राचे खुले किंवा भूवेष्टित स्वरूप हे सागरजलक्षारतेच्या भिन्नतेस कारणीभूत ठरणारे घटक आहेत.

--------------------------

■ कर्कवृत्त व मकरवृत्तावरील क्षारता वितरण स्पष्ट करा. 

उत्तर : कर्कवृत्ताच्या आसपास सागरजलाची क्षारता ३६% इतकी आहे. जास्त तापमान, बाष्पीभवनाचा वेग जास्त आणि समुद्रांचे भूवेष्टित स्वरूप यांमुळे सागरी प्रवाहास असणारे अडथळे या कारणांमुळे इथे क्षारता मकरवृत्तापेक्षा जास्त आढळते.या तुलनेत मकरवृत्ताजवळ सुमारे ३५% इतकी क्षारता दिसून येते.मकरवृत्ताजवळ कर्कवृत्ताच्या तुलनेत जमिनीचे प्रमाण कमी आहे.त्यामुळे अटलांटिक, हिंदी व पॅसिफिक महासागरातील सागरी प्रवाहांमुळे क्षारतेचे नियंत्रण होते.

------------------------

 (३) सागरजलाच्या तापमानभिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ?

उत्तर : सागरजलाच्या पृष्ठीय तापमानावर सागराचे अक्षवृत्तीय स्थान, सागरी प्रवाह, चक्रीवादळे, पर्जन्यमान, सागरी लाटा,सागरजलक्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू हे घटक परिणाम करतात. सागरपृष्ठावरून सूर्यकिरणांचे परावर्तन आणि एका ठरावीक खोलीपर्यंतच पोहोचू शकणारे कमी तीव्रतेचे सूर्यकिरण हे घटक सागरजलाचे खोलीनुसार तापमान ठरवतात. 

--------------------------

(४) खोलीनुसार सागरजलाच्या तापमानात होणारा बदल स्पष्ट करा.

उत्तर : सागरजलाच्या पृष्ठीय तापमानाच्या तुलनेत खोलीनुसार होणारा बदल वैशिष्ट्यपूर्ण आहे. समुद्रसपाटीपासून खोल जावे तसतसे तापमान कमी होते. मात्र, तापमान कमी होण्याचे प्रमाण सर्वत्र सारखेनसते. खोलीनुसार तापमानात पडणारा फरक हा विषुववृत्ताजवळ सर्वाधिक असतो. विषुववृत्ताजवळ सागरजलाचे पृष्ठीय तापमान १८ °से असते,५०० मीटर खोलीवर १२ °से असते, १००० मीटर खोलीवर ८ °से,१५०० मीटर खोलीवर ५°से, तर २००० मीटर खोलीवर ४ ° से होते. थोडक्यात पृष्ठीय भाग ते २००० मीटर खोलीवर विषुववृत्ताजवळ हा बदल १८ °से ते ४ °से इतका असतो. मध्य अक्षवृत्तावर मात्र हाच बदल १४ °से ते ४ ° से इतका असतो. ध्रुवीय प्रदेशात मात्रपृष्ठीय आणि खोलवर तापमान सर्वत्र ४ °से असते.सागरपृष्ठावरून सूर्यकिरणांचे परावर्तन होते, काही प्रमाणातच सूर्यकिरणे एका ठरावीक खोलीपर्यंत जातात आणि या सूर्यकिरणांची तीव्रताही कमी असते. त्यामुळे २००० मीटर खोलीनंतर पृथ्वीवर सर्वत्र सागरजलाचे तापमान स्थिर ४ °से आढळते.

---------------------------

■ क्षारतेवर परिणाम करणारे घटक लिहा.

उत्तर : तापमान आणि बाष्पीभवनाचे वेग, सागराला मिळणाऱ्या नक्ष्यांद्वारे होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा आणि समुद्राचे खुले किंवा भूवेष्टित स्वरूप हे घटक सागरजलाच्या क्षारतेवर परिणाम करतात.तापमान जास्त असल्यास बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. त्यामुळे क्षारता वाढते. उदा., उष्ण कटिबंधीय सागरांची क्षारता. याउलट समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात सूर्यकिरणे तिरपी पडतात, तापमान कमी असते, त्यामुळे बाष्पीभवनही कमी होते, म्हणून क्षारता कमी असते.सागराला मिळणाऱ्या नदया उदा., बंगालचा उपसागर आणि वितळणारे बर्फ उदा., आर्क्टिक महासागर येथे गोड्या पाण्याचा पुरवठा झाल्याने क्षारता कमी असते. खुल्या समुद्रात सागरप्रवाहांमुळे क्षारतेचे नियंत्रण/संतुलन होते.याउलट भूवेष्टित सागरात सागरप्रवाहांत अडथळे आल्यामुळे क्षारता वाढते/जास्त राहते. उदा., भूमध्य समुद्र. 

-------------------------

■प्र.  पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा :

(१) बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते.

उत्तर : बाल्टिक समुद्र हा उत्तर अटलांटिक महासागराचा भागअसून तो युरोपच्या उत्तेरेस समशीतोष्ण कटिबंधात आहे. बाल्टिक समुद्र हा भूवेष्टित समुद्र असल्याने अटलांटिक महासागरातील प्रवाहांचा या समुद्रावर फरसा प्रभाव पडत नाही. शिवाय कमी तापमान, कमी बाष्पीभवन आणि वितळणाऱ्या बर्फापासून होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा या सर्व कारणांमुळे बाल्टिक समुद्र भूवेष्टित असूनही त्याची क्षारता कमी आहे.

-------------------------

(२) तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी, तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते.

उत्तर : ईशान्य आफ्रिका आणि अरेबियाचे द्वीपकल्प यांमध्येअसलेला तांबडा समुद्र हा एक अत्यंत चिंचोळा, लांब समुद्र आहे.या समुद्राचे दक्षिण टोक हिंदी महासागरात असून उत्तरेकडील भाग हाभूवेष्टित आहे. त्यामुळेच हिंदी महासागरातील सागरी प्रवाहांचा प्रत्यक्ष प्रभाव तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस पडतो आणि त्या प्रवाहांमुळेचयेथील क्षारतेचे संतुलन झाल्याने परिणामी क्षारता कमी आढळते.उत्तरेकडील भाग मात्र सहारा वाळवंटाच्या आणि अरेबियाच्या वाळवंटाच्या जवळ असल्याने जास्त तापमान, जास्त बाष्पीभवन होते आणि त्यामुळे तेथील क्षारता जास्त आढळते.

-------------------------

* (३) समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखी आढळत नाही.

उत्तर : सागरजलाच्या क्षारतेवर अक्षवृत्तापेक्षाही तापमान,पाण्याचा पुरवठा आणि सागराचे खुले किंवा बंदिस्त स्वरूप याघटकांचा प्रभाव पडतो. त्यामुळे महासागर समान अक्षवृत्तावर असलेतरी त्यांची क्षारता एकसमान आढळत नाही. उदा., हिंदी महासागआणि अटलांटिक महासागरात समान अक्षवृत्तांवर क्षारता सारखी आढळत नाही. 

--------------------------

 (४) वाढत्या खोलीनुसार सागरजलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते.

उत्तर : सागरपृष्ठावरून बहुतांश सूर्यकिरणे परावर्तित होतात. मात्र, काही प्रमाणात सूर्यकिरणे एक ठरावीक खालीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात. वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते. त्यामुळे वाढत्या खोलीनुसार सागरजलाचे तापमान कमी होत जाते.

-------------------------

(५) बंगालच्या उपसागराच्या तुलनेत अरबी समुद्राची क्षारता जास्त आहे. किंवा

 भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे किंवा आढळतात.

उत्तर : भारताच्या पश्चिमेस अरबी समुद्र असून पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे.अरबी समुद्राचा बहुतांश भाग हा उष्ण कटिबंधात आहे. वर्षातील बहुतांश दिवस या समुद्रावर स्वच्छ सूर्यप्रकाश आणि जास्त तापमान आढळते. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त आहे. भारतातील केवळनर्मदा व तापी या दोनच नदया अरबी समुद्रास गोड्या पाण्याचा पुरवठा करतात, जो तुलनेने कमी आहे. या सर्व कारणांमुळे अरबी समुद्राची क्षारता ३६% इतकी आहे.

या तुलनेत बंगालचा उपसागरही जरी उष्ण कटिबंधात असला,तो तीन बाजूंनी जमिनीने वेढला गेला आहे. या उपसागरावरील आकाश तरी वर्षातील बहुतांश दिवस ढगाळ असते. या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांची संख्याही अरबी समुद्रावरील चक्रीवादळांपेक्षा जास्त आहे. त्याशिवाय भारताच्या सर्व प्रमुख नदया गंगा, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, बांग्लादेशची प्रमुख नदी मेघना (ब्रह्मपुत्र + गंगा + पद्मा) या नद्यांमुळे बंगालच्या उपसागरास गोड्या पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणावर पुरवठा होतो. या सर्व कारणांमुळे बंगालच्या उपसागराची क्षारता ३२% म्हणजे अरबी समुद्रापेक्षा ४% कमी आहे. साहजिकच मिठागरांना पोषक अशी परिस्थिती जास्त क्षारता व उष्ण हवामान भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरच असल्याने पूर्व किनाऱ्यापेक्षा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मिठागरे जास्त आहेत.

--------------------------

(६) मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये सागरजलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते.

उत्तर : २५° ते ३५° अक्षवृत्तादरम्यानचा (दोन्ही गोलार्धात) प्रदेश म्हणजे मध्य अक्षवृत्तीय पट्टा होय. या पट्ट्यांत पर्जन्यमानाचे प्रमाण कमी असते. तसेच नदयांद्वारे होणारा गोड्या पाण्याचा पुरवठाही कमीअसतो. जगातील प्रमुख वाळवंटी प्रदेशही याच पट्ट्यांत असल्याने त्याच्या आसपासच्या समुद्रात बाष्पीभवनाची गती जास्त असते. या सर्व कारणांमुळे मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये सागरजलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते.

July 22, 2023

नववि भूगोल 5) वृष्टी

 5) वृष्टी 

■प्र. पुढील वर्णनावरून वृष्टीची रूपे ओळखा :

(१) हा तुम्ही वापरत असलेल्या पाण्याच मूळ स्रोत आहे. कधी मुसळधार, तर कधी संततधार पडतो. भारतातील बहुतेक शेती याच्यावरच अवलंबून असते.

उत्तर : पाऊस.

-------------------------

(२) पाण्याचे सूक्ष्मकण वातावरणात तरंगत असल्याचा अनुभव येतो. यामुळे लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत सूर्यदर्शन होत नाही.अशी स्थिती सहसा सकाळी किंवा सायंकाळनंतर अनुभवास येते.

उत्तर : धुके 

-------------------------

 (३) विषुववृत्तावर अशी वृष्टी कधीही होत नाही. घन स्वरूपात होणाऱ्या या वृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होते.

उत्तर : गारपीट.

-------------------------

 (४) भूपृष्ठावर शुभ्र कापसासारखे थर साचतात. हिवाळ्यात जम्मू-काश्मीरच्या राजधानीचे ठिकाण बदलावे लागते. महाराष्ट्रातअशी वृष्टी होत नाही.

उत्तर : हिमवृष्टी.

-------------------------

(५) हिवाळ्यात सकाळी/पहाटे गवतावर, झाडांच्या पानांवर

पाण्याचे थेंब दिसतात.

उत्तर : दव.

-------------------------

(६) हिवाळ्यात सकाळी समोरचे काही दिसत नाही, वाहतुकीवर

परिणाम होतो. अपघात होण्याची शक्यताही असते.

उत्तर : धुके.

-------------------------

प्र.  वेगळा घटक ओळखा :

*(१) प्रतिरोध पाऊस, आम्लपाऊस, आवर्त पाऊस, अभिसरण

पाऊस.

 उत्तर-आम्लपाऊस

-------------------------

(२) हिमवर्षाव, पाऊस, गारपीट, दव.

उत्तर- दव

-------------------------

(३) तापमापक, पर्जन्यमापक, वातदिशादर्शक, मोजपात्र.

उत्तर -मोजपात्र

-------------------------

(४) धुके, गारा, दव, दहिवर.

उत्तरे : गारा. 

-------------------------

■प्र. फरक स्पष्ट करा : 

(१) दव आणि दहिवर.

★1)दव

१. भूपृष्ठानजीक सांद्रीभवन क्रिया घडल्यास दव पाहायला मिळते.

२. भूपृष्ठानजीक हवेचा अतिथंड वस्तूंशी संपर्क आल्यास थंड वस्तूच्या पृष्ठभागावर जलबिंदू जमतात, हेच दव होय. 

३. थोडक्यात, दव हे प्रामुख्याने सांद्रीभवन क्रियेमुळे तयार होते.

★2 )दहिवर

  १. भूपृष्ठालगतचे तापमान गोठणबिंदूच्या खाली गेले, तर दहिवर पाहायला मिळते. 

२. तापमान गोठणबिंदूच्याही खाली गेल्याने जमिनीलगतच्या बाष्पाचे संप्लवन क्रियेमुळे हिमकणांत रूपांतर होते, तसेच पृष्ठभागावरील दव गोठते, हेच दहिवर होय. 

३. थोडक्यात, दहिवर हे प्रामुख्याने संप्लवन क्रियेमुळे तयार होते. 

 -------------------------

1)हिम आणि गारा

★हिम

१. संप्लवन क्रियेमुळे हिम बनते.

२. हिम हे प्रामुख्याने हिवाळ्यात

बनते. ३. हवेतील बाष्पाचा अतिथंड हवेशी संपर्क आल्यास हिम बनते.

४. हिमातील हिमकण सुटे असतात. 

५. घनरूपी हिमकणांच्या वृष्टीला

हिमवृष्टी म्हणतात. 

६. हिमवृष्टीतील हिम हे पांढरे अपारदर्शक भुसभुशीत असते. 

७. हिमवृष्टी प्रदेशासाठी बहुतांशी लाभदायकच असते; कारण हिमवृष्टी हाच त्या प्रदेशासाठी जलस्रोत असतो. अतिहिमवृष्टी झाली, तर काही प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. 

★2)गारा

१. हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे बर्फाचे समकेंद्री थर साचून गारा बनतात.

२. गारा या प्रामुख्याने उन्हाळ्यात बनतात.

 ३. अति उष्णता आणि जास्त आर्द्रता यांमुळे ऊर्ध्वगामी प्रवाहातून गारा बनतात. 

४. गारेतील जलकणांचे घनीभवन समकेंद्री असते. 

५. समकेंद्री घनीभवनाने मोठ्या झालेल्या गारा गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने जमिनीवर पडतात, त्यास 'गारपीट' म्हणतात.

६. गारा मात्र टणक व मोठ्या असतात. 

७. गारपीट मात्र बहुतांशी हानिकारक असते. गारपिटीमुळे पिकांचे व शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते. शिवाय घरे, झाडे, विजेचे खांब, माणसे, गुरे, पक्षी यांनाही धोका असतो.  

-------------------------

■प्र. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :

(१) पृथ्वीवर कोणकोणत्या स्वरूपात वृष्टी होते?

उत्तर : आकाशातून किंवा ढगातून जमिनीकडे पाण्याचा द्रवरूपात किंवा घनरूपात होणारा वर्षाव म्हणजे 'वृष्टी' होय. पृथ्वीवर हिम,गारा, पाऊस, धुके, दव, दहिवर या स्वरूपात वृष्टी होते.

--------------------------------

(२) पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कसे असते ?

उत्तर : पर्जन्यछायेच्या प्रदेशात वाहणारे वारे कोरडे असतात.

त्यांची बाष्पाधारण क्षमताही जास्त असते. त्यामुळे या भागात पावसाचे

प्रमाण खूपच कमी असते. म्हणूनच खरंतर या प्रदेशास पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतात.

--------------------------------

 (३) कोणत्या प्रकारचा पाऊस जगात सर्वाधिक भागांत पडतो ? का ?

उत्तर : पर्वतरांगांच्या अडथळ्यामुळे पडणाऱ्या पावसाला प्रतिरोध पाऊस म्हणतात. जगात सर्वांत जास्त भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.

पृथ्वीचे सुमारे ७० टक्के भूपृष्ठ पाण्याने व्यापले असून, बाष्पयुक्त वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहण्याचे प्रमाण जगात जास्त आहे. या तुलनेत आरोह किंवा आवर्ताची परिस्थिती जगात सर्वत्र आणि रोजच नसते. भूपृष्ठावर अनेक पर्वतरांगा, डोंगररांगा सर्वत्र आहेत. या पर्वत/ डोंगररांगांना बाष्पयुक्त वारे अडतात व पर्वताच्या अडथळ्यामुळे असे वारे वर-वर जातात, सांद्रीभवन होते व पाऊस पडतो. या पावसाचे क्षेत्र जगात सर्वत्र व विशाल असते. या तुलनेत आरोह पाऊस फक्त विषुववृत्तीय प्रदेशात व आवर्त पाऊस प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधातच पडतो. थोडक्यात, प्रतिरोध पाऊस जगात सर्वाधिक प्रमाणात पडतो.

--------------------------------

 (४) भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास कोणकोणते जलाविष्कार दिसून येतात ?

उत्तर : भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास धुके, दव व दहिवर हे जलाविष्कार दिसून येतात.

--------------------------------

Tuesday, 18 July 2023

July 18, 2023

नववि भूगोल4) बाह्यप्रक्रिया भाग - २

■प्र. पुढीलपैकी योग्य विधाने ओळखून लिहा : 

(१) तापमानकक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होते.

उत्तर : योग्य.

--------------------------

(२) वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते.

उत्तर : अयोग्य. वाळवंटी प्रदेशात वाऱ्याचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते.

-------------------------

(३) भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते.

उत्तर : योग्य.

-------------------------

(४) वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा यांप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते.

उत्तर : योग्य.

-------------------------

*प्र. ६ पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखून दुरुस्त करून लिहा :

(१) हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो.

उत्तर : अयोग्य. हिमनदीच्या तळभागावरील बर्फ पृष्ठभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो.

-------------------------

(२) मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ यांमुळे नदीचे संचयन कार्य घडून येते.

उत्तर : योग्य.

-------------------------

(३) नदी हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते.

उत्तर : योग्य.

-------------------------

(४) हिमनदीची गती मध्यभागी कमी, तर दोन्ही काठांवर जास्त असते.

उत्तर : अयोग्य. हिमनदीची गती मध्यभागी जास्त, तर दोन्ही काठांवर कमी असते.

-------------------------

■ प्र. चुकीची जोडी ओळखा :

(१) संचयन - 'V' आकाराची दरी.

(२) वहन – ऊर्मिचिन्हे

(३) खनन - भूछत्र खडक.

उत्तर : संचयन - 'V' आकाराची 

-------------------------

■प्र. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :

*(१) नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती ?

उत्तर : नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढीलप्रमाणे

होत : (१) घळई (२) 'व्ही' (V) आकाराची दरी (३) कुंभगर्त (४) धबधबा.

-------------------------

(२) लवणस्तंभांची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते व कोठे होते ?

उत्तर : (१) लवणस्तंभांची निर्मिती भूजल या कारकामुळे होते.

(२) चुनखडकांच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छतांतून ते पाझरते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार गुहेच्या छताशी व तळाशी साचतात व त्यामुळे तेथे लवणस्तंभांची निर्मिती होते.

-------------------------

*(३) सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती ?

उत्तर : सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे

पुढीलप्रमाणे होत : (१) पुळण (२) वाळूचा दांडा (३) खाजण.

-------------------------

(४) हिमोढाचे प्रकार कोणते ?

उत्तर : (१) भू-हिमोढ, पार्श्व हिमोढ, मध्य हिमोढ व अंत्य हिमोढ हे हिमोढाचे चार प्रकार होत.

(२) हिमनदीच्या तळाशी संचयित झालेल्या हिमोढास भू-हिमोढ म्हणतात.

(३) हिमनदीच्या काठाकडील संचयित हिमोढास पार्श्व हिमोढ म्हणतात.

(४) जेव्हा दोन हिमनदया एकत्र येतात, तेथे त्यांच्या आतील दोन कडांच्या भागातील पार्श्व हिमोढांपासून मुख्य हिमनदीच्या पात्रात मध्य हिमोढ तयार होतो.

(५) हिमनदीच्या अग्रभागी म्हणजे जेथे हिमप्रवाहाचे जलप्रवाहात रूपांतर होते, तेथून पुढे जलप्रवाह हिमनदीने आणलेला सर्व हिमोढ पुढेवाहून नेऊ शकत नाही. त्यामुळे या भागात हिमोढ साचतो. हा हिमोढ हिमनदीच्या शेवटच्या भागात असल्यामुळे त्याला अंत्य हिमोढ म्हणतात.

-------------------------