Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday 22 June 2021

23 जून संस्कारमोती- दैनंदिन शालेय परिपाठ

             दैनंदिन शालेय परिपाठ


सुविचार
*केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे'
● जाती धर्माच्या भिंती ओलांडून पलीकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य फक्त कलेत व दृढनिश्चियात आहे.
श्लोक
यदा यदा हि धर्मस्य हानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सूनाम्यहम् ॥ श्रीभगवद्गीता 
जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा हात होतो. आणि अधर्माचे वर्चस्व होते त्या वेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होती.


चिंतन
कला म्हणजे परमेश्वराचे मंदिर आहे. जग निसर्गाने घडपिले विज्ञानाने जगाला प्रगती दिली तर कलेने त्याला सौंदर्य दिले. प्रसन्नता दिली. कांच्या अधिकारने आपले नेहमीचं जीवन देखील रम्य भासू लागते. जेवताना सनईचे गोड स्वर कानी पडले. झोपताना अंगाईचे सूर ऐकू आले आणि पहाटे भूपाळीच्या गोड शब्द डोळे उपडले तर कुणाला प्रसन्न वाटणार नाही? साध्या शब्दातून सांगायचे ते कवितेतून सांगितले तर ते हृदयात पोहोचते आणि त्याला सुरांची जोड दिली तर हृदयात रुजते. कप अशी माणसाला प्रसन्नतेथे वरदान देते.

कथाकथन
दृढनश्चयी धुव्रबाळ
फार पूर्वी उत्तानपाद नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला दोन राण्या होत्या एक होती आवडती तिथे नाव होते सुरुची नि दुसरी होती नावडती, तिथे नाव सुनीती सुरुचीच्या मुलाचे नाव उत्तम व सुनीतीच्या मुलाचे नाव ध्रुव असे होते सुरुची राजवाड्यात राहत असे पण सुनीतीला मात्र दूर राहावे लागे. एके दिवशी काही मुलांबरोबर व खेळत असता इतर मुलांनी त्याला तुझ्या वडीलांचे नाव काय, असे विचारले. वाला काहीच माहित नकते. म्हणून तो धावत आईकडे आता व म्हणाला. आई, माझे बाचा कोण? ते कुठे आहेत? ध्रुवाचे हे बोलणे ऐकून त्याची आई म्हणाली, बाळ, उत्तानपाद राजे हे तुझे वडील आईचे बोलणे ऐकताच याला खूप आनंद झाला व आई नको म्हणत असताना तो राजवाडयात धावत आला. उत्तानपाद राजा तेव्हा सिंहासनावर बसला होता. पुबबाळाला पाहून राजाने चटकन त्याला उचलून घेतले व आपल्या मांडीवर बसविले नि तो प्रेमाने कुरवाळू लागला. इतक्यात सुरुची तेथे आली. राजाने याला मांडीवर बसविले हे तिला आवडले नाही. ती रागाने म्हणाली महाराज माझ्या उत्तमऐवजी पोराला काय म्हणून मांडीवर बसविले? त्याला खाली उतरवा. राजाने तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता तो धुवाशी गोड गोड बोलण्यात दंग होता. राजा ऐकत नाहीसे पाहून सुरुची अधिकच रागावली व तिने वाला राजाच्या मांडीवरून खाली ढकलून दिले. छुपाला फार वाईट वाटले नि तो रडत रडत आपल्या आईकडे आला व म्हणाला, आई, असे का झाले? सुनीतीने ध्रुवाची समजूत घातली. ती म्हणाली, "बाळ, आपण मनापासून देवाची भक्ती केली म्हणजे आपल्याला हवे से मिळेल यावर व म्हणला, 'आई, तो देव आहे तरी कुठे सुनीती म्हणाली, बाळ, देव खूप लांब अरण्यात असतो. "आईचे बोलणे संपते न संपते तोच ध्रुव आईला म्हणाला, आई, तर मग भी अरण्यात जाऊन त्या देवाला भेटतो आई म्हणाली, बाळ तू अजून लहान आहेस. अरण्यात वाघ, सिंह असतात. ते तुला त्रास देतील. तू आताच मला सोडून जाऊ नकोस ध्रुवाने निश्चयाने सांगितले. आई, आता मी देवाला भेटल्याशिवाय परत येणार नाही तू माझी काळजी करू नकोस. लागलीच ध्रुव निघाला. तो खूप लांब अरण्यात शिरला नि एका झन्याच्या काठी असलेल्या झाडाखाली बसला. इतक्यात नारदमुनी आले. या लहानग्या मुलाला अरण्यात पाहून त्यांना नवल वाटले. ते वाला म्हणाले. बाळ, तू एकटा या अरण्यात कशाला आलास म्हणाला मला देवाला भेटायचे आहे. म्हणून मी देवाची प्रार्थना करण्यासाठी येथे आलो आहे नारदमुनीनी देवाची प्रार्थना करण्यासाठी ध्रुवाला एक मंत्र सांगितला व ते निघून गेले. ध्रुवाने खूप वर्षे त्या मंत्राचा जप केला, त्याचा दृढ निश्चय नि भक्ती पाहून श्री विष्णुदेव त्यात प्रसन्न झाले नि म्हणाले, बाळ, तुला काय हवे ते माग, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे व बोलला, 'देवा, माझ्या आईला सुखी कर नि मला जेथून कोणी ढकलणार नाही अशी जागा दे तथास्तु' पुढे ध्रुवाने पुष्कळ वर्षे राज्य केले व शेवटी देवाने दिलेल्या जागी तो गेला. मुलांनो, आकाशात उत्तरेकडे जो तारा नेहमी एकाच जागी दिसतो तो ध्रुवतारा म्हणून ओळखला जातो. तोच आपत्ता ध्रुवबाळ, बरं का!

दिनविशेष
भारतीय नभोवाणीची प्रथम सतकारी १९२७ : २३ जून १९२७ रोजी संध्याकाळी ६ वा. भारतीय नभोवाणी मुंबईहून अधिकृतपणे घुमली. याआधी २ वर्षापूर्वीपासून फक्त मुंबई शहराच्या कक्षेत कानाला यंत्र लावूनच कार्यक्रम ऐकू येत. पाश्चिमात्य आणि भारतीय संगीताचाच समावेश कार्यक्रमात असे. ही नभोवाणी खासगी कंपनीच्या मालकीची होती. याच काळात पाश्चिमात्य देशातून रेडिओचा प्रसार झपाट्याने होत होता. हिंदुस्थानी लोकांकडून आपला फायदा होईल, अशा रितीने रंजन, शिक्षण देण्यासाठी रेडिओचे माध्यम उत्तम आहे. याची जाणीव तेव्हा ब्रिटिश राजसत्तेला झाली व त्यानी इंडिया कॅलेंडर केबल्स' ही खासगी कंपनी ताब्यात घेऊन 'इंडियन ब्रॉडकॉस्टिंग' या नावाने २३ जून १९२७ पासून हा सरकारी उद्योग म्हणून चालू केला. लॉर्ड आयर्विन यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले व नंतर सुप्रसिध्द गायक फैयाझखाँचे संगीत मुंबईकरांना ऐकायला मिळाले. स्वातंत्र्योत्तर काळात नभोवाणीचा विकास झपाट्याने झाला. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, सांगली, जळगाव, परभणी आणि रत्नागिरी अशी नभोवाणी केंद्रे चालविली जात आहेत.

मूल्ये 

*कर्तव्यदक्षता, समता, निसर्गप्रेम. →

अन्य घटना

• प्लासीची लढाई झाली व बंगालचा नवाब सिराजउद्दौला याचा पराभव होऊन ब्रिटिश सत्तेची मुहूर्तमेढ रोवली गेली १७५७ • नानासाहेब पेशवे (बाळाजी बाजीराव) स्मृतिदिन १७६१ राष्ट्रमाता इंदिरा गांधींचे सुपुत्र व युवा नेते संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन १९८० • काँग्रेसचे जेष्ठ नेते व मुंबईचे माजी महापीर स.का. पाटील यांचे निधन १९८१

उपक्रम• 

शाळेत एक शालेय नभोवाणी मंडळ स्थापन करा व दर आठवड्याला त्याचा कार्यक्रम करा. यात मागील आठवड्यातल्या बातम्या, एखादी मजेदार, आश्चर्यकारक माहिती व चांगली कामे केलेल्यांची मुलाखत सादर करा.

समूहगान राष्ट्र की जय चेतना का गान बंदे मातरम्.....

सामान्यज्ञान -
. • अरुडेल रुक्मिणी देवी प्रसिद्ध नृत्य कलाकार
• नितीन बोस प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक  • नंदलाल बोस प्रसिध्द शिल्प कलाकार
• लता मंगेशकर सर्वश्रेष्ठ गायिका

No comments:

Post a Comment