Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 21 June 2021

22जून, संस्कारमोती- दैनंदिन शालेय परिपाठ

               दैनंदिन शालेय परिपाठ





सुविचार:
जीवन कसे जगलात याला महत्व नाही, जीवन कसे जगलात याला महत्व आहे.-रणजीत देसाई

श्लोक बुष्दिभेदं जनयेत् अज्ञानां कर्म संगिनाम् । जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान युक्तः समाचरन् ।
(ज्ञानी) पुरुषाने, कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञ लोकांचा बुद्धिभेद करू नये. (त्यांची बुद्धी विचलित करु नये) तर आपण स्वतः योगयुक्त (चित्त संतुलित ठेवून होऊन सर्व कर्माचे नीट आचरण करीत त्यांच्याकडूनही सर्व कर्मे करवून घ्यावीत त्यांनाही प्रेरित करते संस्कार विद्वानांनी अनासक्तपणे कर्म करण्याचा उपदेश करण्याऐवजी आपल्या आचरणातून त्यांना अनासक्त राहून कर्म करण्यास प्रेरित करावे.

चिंतन
'समाजाचे पुढारी होण्यास विद्वत्तेपेक्षा सदाचरण, धर्मनिष्ठा, स्वार्थत्याग यांची अधिक जरुरी असते. लो. टिळक पुढारी म्हणजे समाजाला पुढे नेणारा, जो पुढे असतो त्याचे मागील लोक अनुकरण करतात. म्हणून पुढे असणाऱ्या नेत्याने आपले वर्तन आदर्श व् हवे म्हणजे त्याच्या अनुकरणाने समाज आदर्श बनेल आदर्श वर्तन म्हणजेच सदाचरण, धर्मनिष्ठा आणि त्यागभावना याचा मिलाफ असा आदशे पुढारी ज्या ज्या देशाला लाभला त्या देशाने प्रगती करुन घेतली. मग तो भारत असो की जपान विचारस्वातंत्र्य हा राष्ट्राचा आत्मा आहे.

कथाकथन-
'लोकमान्यांचे धैर्योद्रार
इंग्रजांच्या राजवटीतून देश मुक्त करण्यासाठी भारतभर आपआपल्या परीने प्रयत्न चालू होते. कुठे बॉय फुटत होते, कुठे क्रांतिकारकांच्या पिस्तुलांना गोरे अधिकारी बळी पडत होते कुठे दारुच्या गुत्त्यांवर निरोधन केले जात होते, तर कुठे विदेशी कपडे जात होते. देशभर चालू झालेल्या या प्रकारामुळे चक्रावून गेलेले ब्रिटिश सरकार जुलूम व अत्याचार यांच्या जात्यात प्रजेता भरडून काढीत होते. अशा स्थितीत ब्रिटिशांनी चालविलेल्या या अत्याचारांवर खरमरीत आगपाखड करणारे हे उपाय टिकाऊ नाहीत. बांबगोळ्याचे रहस्य अशांसारखे जळजळीत को टिळकांनी आपल्या 'केसरी' या वृत्तपत्रात लिहिले. लोकमान्यावर ब्रिटिश सरकारचा राग होताच त्याने त्यांना एकदा तुरुंगात टाकले होतेच. आता या अग्रलेखाचे निमित्त काढून ब्रिटिश सरकारने लोकमान्य मुंबईत असताना त्यांना अटक केली व तुरुंगात डांबले. त्यावेळच्या मुंबई राज्याच्या गव्हर्नर जॉन क्लार्कने १३ जुलै १९०८ रोजी त्यांच्यावर विविध आरोपांबद्दल न्यायालयात खटला भरला मुंबईचे न्या मू. दावर यांच्यापुढे खटल्याचे कामकाज सुरू झाले. लोकमान्यांनी आपल्यातर्फे वकील न देता, स्वतःच स्वतःची बाजू मांडली. सरकारी वकिलाने लोकमान्यांच्या विविध अपराधांचा पाढा वाचून ते कसे राजद्रोही आहेत हे दाखवून दिले; या उलट लोकमान्यांनी ५ दिवसात एकून २१ तासांपेक्षाही अधिक बोलून आपण कसे निर्दोष आहोत, ते मुद्देसूद सांगितले. पण काही झाले तरी ब्रिटिश सत्तेच्या ताब्यातील न्यायालय ते दोन्ही बाजूंचे म्हणणे केवळ रीत म्हणून ऐकून घेऊन ब्रिटिशधार्जिण्या ज्युरींच्या सल्ल्याने न्यायमूर्तींनी लोकमान्यांना त्यांच्या दोन अपराधाकरीता ६ वर्षे काळयापाण्याची शिक्षा दिली. तर तिसऱ्या अपराधाकरिता १०००रु. दंड ठोठावला. एवढी जबर शिक्षा ठोठावली असतानाही निश्चल राहिलेल्या त्या निर्भय महापुरुषाला न्या. मू. दावर यांनी विचारले, "दिल्या गेलेल्या शिक्षेबद्दल तुम्हाला काही म्हणायचे आहे काय? यावर लोकमान्य म्हणाले, न्यायालयानं जरी मला अपराधी ठरविलं असलं, तरी मी अपराधी नाही. एकूण लौकिक गोष्टींचे नियंत्रण करणारी या न्यायालयाच्या कितीतरी पटीने श्रेष्ठ अशी एक ईश्वरी शक्ती आहे. मी शिक्षा भोगल्याने माझ्या देशबांधवांमध्ये या परकीय सत्तेविषयीचा असंतोष वाढीला लागून स्वातंत्र्याची घटका जवळ यावी यासाठी या सत्तेने तुम्हाला मला शिक्षा देण्याची बुध्दी दिलेली असते. लोकमान्यांचे हे धैर्योद्रार ऐकून न्यायाधीशासहित सर्व थक्क झाले.

दिनविशेष
इटालियन देशभक्त जोसेफनी जन्मदिन १८०५ मॅझीनी इटलीतील राष्ट्रवादाचा जनक मानला जातो. राष्ट्रवाद धर्म होय अशी शिकवण त्याने तुकडे-तुकडे झालेल्या इटलीला दिली जुलमी सत्ताधीशांमुळे जनतेचे जीवन असा होत चालले होते या करण्यासाठी कार्बोनेरी नामक गुप्त संघटना निर्माण झाली मझिनी या संस्था सभासद होता त्यांच्या भावनाप्रधान राष्ट्रवाद विरोध इटलीच्या जनतेला प्रेरित केले. राष्ट्राच्या दुदैवी परिस्थितीची सूचक अशी काळी पीत तो आपल्या दंडावर खापी इटलीतून त्याच्यामुळे त्या पार करण्यात आले तो पैसा गेला. तिथे त्याने यंग इटली' नावाची क्रांतिकारी संघटना स्थापना केली गरिबाडीसारखे जहाल देशभक्त त्याच्या एआइटी एकीकरण पचपन पशायी होण्यासाठी महिनीने चारित्र्य, शिक्षण, स्वार्थत्याग या गोष्टीवर भर दिला राष्ट्रीय ऐक्य उच्चारविचार स्वातंत्र्य व परकीयांपासून मुक्तता या मंत्राचा घोष त्याने केला जाऊन तो तेथील कायमचा रहिवासी झाला त्याने आपल्या राष्ट्रीय चळवळीची सूत्रे हनविकी १८७० साली इटली स्वतंत्र होऊन एक राष्ट्र बनते या एकीकरण कार्यात झिनीया आहे

मूल्ये
स्वाधीनता राष्ट्रप्रेम, निर्भयता शुचिता, कर्तव्यदक्षता

अन्य घटना-
देशभक्त दामोदर हरी चाफेकर पानी चालो रेडवर गोळ्या झाडल्या १८९७ ●ो. टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा. १९०८ महानुभाव वाड्मयाचे विद्यान व नामवंत साहित्यिक डॉ विष्णू भिकाजी १९०८ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीचे निधन १९५३ महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर ३० जागा राखीय १९९४क्षणास प्रारंभ कर्क संक्रमण • मझिनी या स्वा. सावरकरांच्या पुस्तकातील विचार निवडून • वेगवेगळ्यांच्या पराक्रमी देशभक्तांची माहिती जमवून एक हस्तलिखित तयार करा.

समूहगान
दिल दिया है जान भी देंगे ऐ

सामान्यज्ञान
नेहमीच्या वापरातील धातुपेला सोने जास्त आहे. पायामध्ये ते तरंगते १०६३ अंश सेल्सिअस तापमानात होतो तर २९७० अंशात सोने उन त्याची वाफ होते

No comments:

Post a Comment