८
माय - स. ग. पाचपोळ
१. प्रश्नोत्तरे
( 1)* प्रश्न १. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा :
(१) कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे?
उत्तर : चुलीसाठी लाकडे गोळा करण्यासाठी आई रानात जायची. तिच्या पायांत साध्या चपलाही नसायच्या रानभर अनवाणी कष्ट करीत वणवण फिरायची. विंचू चावेल किंवा काटेकुटे बोचतील याची आईला पर्वा नसायची,
(२) कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय करीत असे?
उत्तर : कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याला उसनेपासने आणून खायला घालते. त्याच्यासाठी नाना तऱ्हेचे पदार्थ आणते. आई कवीला म्हणते घाई करू नको. पोटभर खा.
(३) कवीच्या आईचे डोळे का भरून येतात ?
उत्तर : कवीचे शिक्षण आता बस झाले, असे कवीचे वडील आईला सांगतात. त्याने शेतावर काम करावे, अशी त्यांची इच्छा असते. आईला मात्र मुलाला खूप शिकवायचे असते. त्यामुळे आईला वडिलांचे बोलणे आवडत नाही; ; म्हणून तिचे डोळे भरून येतात.
(४) आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा, असे कवीला का वाटते?
उत्तर : कवीने खूप शिकावे, असे आईला वाटते. त्यासाठी ती अपार कष्ट करते. वडिलांना विरोध करते. सूनमुख पाहण्यासाठी ती अधीर आहे. म्हणून मुलावर प्रचंड प्रेम करणाऱ्या अशा या प्रेमळ आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा, असे कवीला वाटते.
(५) आईसाठी कवीला काय करावेसे वाटते ?
उत्तर : अपार कष्ट करणाऱ्या आईची ओटी सुखाने भरावी, असे कवीला वाटतेजी जन्मभर आपल्यासाठ झिजली; त्या माउलीच्या चरणाशी सुखाच्या राशी ओताव्यात. तिला सुखीसमाधानी जीवन दयावे. अशा या आईच्या पायाशी नम्र होऊन तिला वंदन करावे, असे कवीला वाटते.
( 2) प्रश्न २. कोण, कोणास व का म्हणाले?
(१) करू नको घाई म्हणे पोटभर खाय
उत्तर : असे कवीची आई कवीला म्हणायची. कवी सुट्टीमध्ये खूप दिवसांनी घरी आला. तिकडे दूर त्याची खाण्याची आबाळ होत असेल; म्हणून आई त्याला मायेने म्हणाली.
(२) बस झालं शिक्शन याचं, घेऊ दे हाती रूमनं.
उत्तर : असे कवीचे वडील कवीच्या आईला म्हणाले. मुलाने शिक्षण न घेता. शेती करावी व आपल्याला हातभार लावावा, असे वडिलांचे म्हणणे होते. म्हणून ते असे म्हणाले.
(३) या डोयानं पाहीन रे भी दुधावरची साय.
उत्तर असे आई कवीला म्हणाली. आपल्या मुलाने लग्न करून संसार फुलवावा आणि दुधावरच्या सारखी नातवंडे डोळ्यांदेखत बागडावी, अशी आईची इच्छा आहे. म्हणून ती असे म्हणाली.
(४) अन् ठेवावे माय घट्ट धरून तुहे पाय.
उत्तर असे कवी आईला म्हणाला. अपार कष्ट करणाऱ्या आईमुळे कवी शिक्षण घेत आहे. तिच्याविष कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कवी असे म्हणाला.
मुक्तोत्तरी प्रश्न
(3)* • कविता वाचताना तुम्हांला कोणकोणते प्रसंग अस्वस्थ करतात, ते लिहा.
उत्तर : (१) काट्याकुट्यांची किंवा विंचवाच्या देशाची पर्वा न करता आई रानावनात लाकडांसाठी हिंडते. (२) मुलगा घरी आल्यावर त्याला मायेने खाऊ-पिऊ घालते. (३) मुलाच्या वडिलांना विरोध करताना तिच्या डोळ्यांतल्या अश्रूंना कवीला तापी व पूर्णा नदीचे पाणी दिसते. (४) कवीला पुन्हा एकदा आईच्या पोटी जन्म घ्यावासा वाटतो. हे सारे प्रसंग अस्वस्थ करणारे आहेत.
भाषाभ्यास व व्याकरण
(4)* प्रश्न १. पुढील शब्द पाहा :
वहाण चपला; वाहन - प्रवासाचे साधन.
उच्चारात बरेच साम्य असलेले; पण अर्थ भिन्न असलेले असे शब्द माहीत करून घ्या, लिहा, त्यांचे
अर्थ समजून घ्या.
उत्तर : (१) दिन दिवस; दीन - गरीब, दरिद्री.
(२) अर्पण - देणे; अपर्ण - पानांशिवाय.
(३) उषा सकाळ; उश्या (४) कपास • कापूस; कंपास - झोपताना डोक्याखाली घ्यायचे साधन. आकृती काढण्याचे साधन
(5).* प्रश्न २. पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :
आई_माय
चपला_वहाणा
विंचू_इचू
डोया_डोळा
(6)* प्रश्न ३. पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
सावकाश_घाई
एकदा_अनेकदा
सुख_दुःख
उपाशी_पोटभर
(7)* प्रश्न ४. गळ्याची आण घालणे, कान भरणे हे वाक्प्रचार या कवितेत आलेले आहेत. गळा व कान या अवयवांवरील वाक्प्रचार माहीत करून घ्या व त्यांची यादी तयार करा.
उत्तर : (१) गळा (१) गळा भरून येणे (२) गळा दाटून येणे (३) गळ्यात पडणे (४) गळफास लागणे
(५) गळा काढणे.
(२) कान - (१) कान फुंकणे (२) कानाशी लागणे (३) कान पकडणे (४) कानपिचक्या देणे (५) कानांवर येणे
(8).* प्रश्न : पुढे दिलेल्या सर्वनामांचा उपयोग करून वाक्ये लिहा :
(1) कोण - घरी कोण आले ?
(2)काय_तुला काय हवे ?
(3)ही_ही गुरे आमची आहेत.
(4) हे_ हे झाड चाफ्याचे आहे.
(5)ती- ती शेते आमची आहेत.
No comments:
Post a Comment