६ :पण थोडा उशीर झाला..
संकलित मूल्यमापन
(1)* प्रश्न १. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा :
(१) लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते व का वाटते ? उत्तर : अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाणी सेवा बजावणे, हे सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम असते. अतिशय थंड हवामान व सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा या प्रतिकूल स्थितीत ही सेवा करायची असते; म्हणून लेखकाला ते प्रचंड अवघड काम असते.
(२) पोस्टमन आल्यावर बटालियनमध्ये झुंबड का उडत असे ?
उत्तर : सरहद्दीवरचे सैनिक आपापल्या गावापासून खूप दूर एकटे असायचे. प्रत्येकाला गावची व घराची ओढ असायची. गावाकडून आलेले पत्र त्यांना दिलासा देत असे. म्हणून आठ-पंधरा दिवसांतून एकदा पोस्टमन आला की गावची खुशाली कळावी; म्हणून बटालियनमध्ये सैनिकांची झुंबड उडत असे.
(३) गावाकडचा सांगावा ऐकून लेखकाची अवस्था कशी झाली ?
उत्तर : गावाकडून आलेल्या सुखदेवने लेखकाला गावाकडचा सांगावा सांगितला. लेखकाची आई खूप आजारी होती. आईने त्याच्यासाठी निरोप पाठवला होता. तिचा प्रत्येक शब्द लेखकाच्या मनाचा ठाव घेत होता. त्याचे मन ढसढसा रडत होते. डोळ्यांत एकसारखे अश्रू ओघळत होते. लेखकाचा जीव घाबराघुबरा होऊ लागला व मन सैरभैर झाले
(2).प्रश्न २. का ते लिहा :
(१) कारगीलमधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आल्हाददायी वाटतो.
उत्तर : कारगील सीमेवरचा पावसाळा व हिवाळा जीवघेणा असतो. परंतु उन्हाळ्यात पहाडावरचे बर्फ वितळते. पर्वतरांगा गडद हिरव्या रंगाने नटून जातात. जणू धरतीने हिरवागार शालू नेसला आहे, असे वाटते. अशा रमणीय निसर्गामुळे लेखकाला कारगीलमधील उन्हाळा सुखावह आणि आल्हाददायी वाटतो.
(२) लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे.
उत्तर : लेखकाला पत्नीने जे अंतर्देशीय पत्र पाठवले होते, त्यात मजकूर नव्हताच. फक्त पत्नीच्या अश्रूंचे सुकलेले डाग होते. त्या डागांवरून त्याला आईची खालावलेली तब्येत लिखाणाशिवायच कळली. ते पत्र मजकुराविना खूप काही बोलून गेले. म्हणून लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे.
(३) गावाकडे जाताना रस्ता कटता कटत नव्हता, असे लेखकाला वाटले.
उत्तर : आईची आजारपणाची बातमी कळताच लेखक सामानाचा पसारा आवरून गावाला जायला निघाला. आठ-दहा दिवसांचा प्रवास होता. वेळ सरता सरत नव्हता. आईला कधी एकदा पाहीन असे लेखकाला झाले होते. तिच्या मायेच्या स्पर्शासाठी तो आसुसलेला होता. त्या त्याच्या अस्वस्थ मनःस्थितीमुळे गावाला जाताना रस्ता कटता कटत नव्हता, असे लेखकाला वाटले.
(४) पण थोडा उशीर झाला... असे लेखकाने म्हटले आहे.
उत्तर : आजारी आईला पाहण्यासाठी जेव्हा लेखकाने गावच्या वेशीत प्रवेश केला, तेव्हा सगळे गावकरी त्याच्याकडे कावरेबावरे होऊन पाहू लागले. लेखक हातातली ट्रंक टाकून घराच्या दिशेने धावले. वाड्याच्या दरवाजात बहिणी त्याच्या गळ्यात पडून रडू लागल्या. सर्व भाऊबंद माना खाली घालून बसले होते. लेखकाची नजर आईला शोधण्यासाठी घरभर फिरत होती. मन आतुर झाले होते. पण लेखकाला जाणीव झाली की आई यापुढे कधीच त्याला दिसणार नव्हती. ती लेखकाला न भेटताच जग सोडून गेली होती; म्हणून थोडा उशीर झाला.... असे लेखकाने म्हटले आहे.
(3)* प्रश्न ३. वसुंधरेचे व सैनिकाच्या मनाचे वर्णन करणारी तुम्हांला आवडलेली वाक्ये पाठातून शोधून लिहा :
उत्तर :
वसुंधरा :उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्याकंच रंगाने नटून जातात; जणू वसुधेने हिरवागार शालू परिधान केला आहे.
सैनिकाचे मन: रमणीय निसर्ग आमचे मन उल्हसित करायचा. आलेलं पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकाचं मन चंद्रमण्यासारखं पाझरून कधी वाहू लागायचं, ते समजायचं नाही. गावाकडच्या आठवणींना उजाळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो.
(4)* प्रश्न ४. कारगील या ठिकाणाचे विशेष वर्णन करणारे पाठात आलेले शब्द आकृतीत लिहा :
कारगील
दुर्गम प्रदेश
अतिशय खडतर हवामान
अतिशय थंड हवामान
सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा
मुक्तोत्तरी प्रश्न
(5)* • सैनिक जसे देशाचे रक्षण करतात, तसे तुम्हांला आपल्या देशासाठी काय करावेसे वाटते ?
उत्तर : (१) चांगल्या नागरिकांचे कर्तव्य पार पाडणे. (२) देशाची मान खाली जाईल, असे कोण काम न करणे. (३) राष्ट्रीय एकात्मता टिकवणे. (४) राष्ट्रप्रेमाचा प्रसार करणे.
(6)* प्रश्न ३. 'पाव्हणेरावळे' यासारखे तुम्हांला माहीत असलेले जोडशब्द लिहा. त्या जोडशब्दांच वाक्यांत उपयोग करा :
(२) कावराबावरा
उत्तर : (१) घाबराघुबरा: जंगलातून एकट्याने जाताना जीव घाबराघुबरा होतो. :
(2)कावराबावरा:नदीला अचानक पूर आला, तेव्हा गावकरी कावरेबावरे झाले. :
(3) सणवार:श्रावण महिन्यात अनेक सणवार साजरे होतात.
(४) जेवणखावण : पाहुणे आले की आई त्यांचे जेवणखावण करतेच.सणवार
(7) प्रश्न ४. 'मन' शब्द असलेले पाठातील वाक्प्रचार लिहा.
उत्तर : (१) मन उल्हसित करणे (२) मन चंद्रमण्यांसारखे पाझरणे (३) जीव तीळ तीळ तुटणे (४) ऊर अभिमानाने फुलून येणे (५) अंतरंगाचा ठाव घेणे (६) जीव घाबराघुबरा होणे (७) मन सैरभैर होणे (८) मन हेलावणे (९) मन आतुरणे.
(8)प्रश्न ५. पुढील वाक्यांतील सर्वनामे ओळखून लिहा : (१) मी बजावत असलेल्या देशसेवेची तिला जाणीव होती. (२) तू आपल्या भारतमातेला जप.
(३) सगळे माझी नीट काळजी घेतात, मला जपतात. उत्तरे : (१) मी, तिला (२) तू. आपल्या (३) माझी, मला.
२. लेखन विभाग
(9)* ● तुम्हांला एका सैनिकाची मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी प्रश्न तयार करा.
उत्तर:
प्रश्न : (१) सैनिक व्हावे, अशी इच्छा तुम्हांला कधी व कशी निर्माण झाली ?
(२) सैनिक होण्यासाठी तुम्ही काय केले ?
(३) घरातील माणसांच्या प्रतिक्रिया काय होत्या ?
(४) सैनिक असण्याचा तुम्हांला अभिमान वाटतो का ?
(५) तुमच्या कामगिरीचा एखादा रोमहर्षक प्रसंग सांगा.
(६) तुम्ही देशातील तरुणांना काय संदेश दयाल ?
(10)* • पोस्टातील पत्राचा प्रवास कसा होतो, ते माहीत करून घ्या.
(१) हात आहेत; पण हालवत नाही.._खुर्ची
(२) पाय आहेत; पण चालत नाही.._टेबल
(३) दात आहेत; पण चावत नाही _.फणी
(४) नाक आहे; पण श्वास घेत नाही. _सुई
(५) केस आहेत; पण कधी विंचरत नाही. _ब्रश
No comments:
Post a Comment