Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Thursday 24 June 2021

25 जून- संस्कारमोती- शालेय दैनंदिन परिपाठ

         शालेय दैनंदिन परिपाठ



श्लोक:
वंदे मातरम् ।
सुजलां दिया सुफलाम् महशीतलाम सत्यशामा मातरम् । वंदे मातरम् ॥ शुभज्योत्तनां पुतकीत यामिनीम् फुस्तकुसुमित मदत शोभिनीम् ॥ सुहासिनी, सुमपुर भाषिणीम् सुखद, वरदां मातरम् । वंदे मातरम् ॥ बंकीमचंद्र चटोपाध्याय
- हे भारत माते, तुला आम्ही वंदन करतो. तू उत्तम जतांनी संपन्न असलेली, उत्तमोत्तम फळांनी समृद्ध बनलेली मतपगिरीवरीत चंदनाच्या बनातून वाहात येणान्या सुगंधीत यान्यांनी शांत शीतल झालेली आणि सर्व प्रकारच्या पिकांनी सतत हिरवीगार दिसणारी आहेस हे मातृभूमि तुला आम्ही वंदन करतो. हे भारतमाते रात्रीच्या शुभ्रधवल चांदण्याने तू रोमांचित होत असतेस फुलांनी डवरलेल्या वृक्षराजीमुळे तू शोभायमान दिसतेस तू नेहमीच प्रसन्न राहतेस. तू मधुर भाषण करणारी आहेस. तू आम्हाला सदैव सुख देत असतेस: आमच्या सर्व आशाआकांक्षा पूर्ण करतेस हे माते, तुला आम्ही चंदन करतो

चिंतन
वेदमंत्राहून आम्हा बंध वंदे मातरम्' स्वातंत्र्य हा एकच ध्यास लागलेल्या क्रांतिकारकांच्या तोंडी अत्यंत पवित्र दोनच शब्द होते ते म्हणजे वंदे मातरम्, माझ्या मातृभूमीला मांझे चंदन असो. बेदमंत्र उच्चारताना माणसाचे मन जितके एकाग्र होत असे तितक्या एकाग्रतेने भारतीय क्रांतिकारकांनी देशभक्तीचे व्रत पाळले. या व्रताच्या यज्ञकुंडात स्वतःच्या प्राणांचीही प्रसंगी आहुती दिली. या दोन शब्दांचे पावित्र्य जपण्यासाठी त्यांनी आपल्या छातीची ढाल केली. आज अभिमानाने हे गीत म्हणत असताना त्या अभिमानास्पद भूतकाळाची आठवण हृदयात जागी ठेवायला हवी.

कथाकथन
आपल्यावरून जग ओळखावे सुमारे पाच सहाशे वर्षांपूर्वी मुसलमान आणि ख्रिस्ती लोक यामध्ये कडाक्याचे युद्ध चालले होते. एका सवाईत तुर्क लोकांचे ५०० शिपाई ख्रिस्ती लोकांनी कैद केले आणि त्यांना बाजारात नेऊन गुराप्रमाणे विकून टाकले, अशा लोकांना गुलाम म्हणतात त्यांपैकी अहमद नावाच्या गुलामास एका ख्रिस्ताने शंभर होनास विकत घेतले. तो मनुष्य अहमदाला आपल्या घरी बैलाप्रमाणे राबवीत असे धनी देईल ते वयाचे आणि सांगेल ते काम करावयाचे काम करण्यास चुकले की चाबकाचे फटके खावयाचे असा राक्षसी छळ त्याने म्हातारपणापर्यंत सोसिता पुढे त्याच्याच्याने काम होईनासे झाले. म्हणून धन्याने त्याला दुसऱ्या एका ख्रिस्त्यास विकले. तेथेही त्याच्या नशिबी तेच त्याला त्या गुलामगिरीचा जाच सहन होईनासा झाला. रोज तो धाय धाय रडे आणि परमेश्वराची प्रार्थना करी, की 'हे देवा, असली खडतर गुलामगिरी तू कोणाच्याही नशिबी लिहू नकोस ।" अशा स्थितीत काही दिवस लोटल्यावर एका दयाळू मनुष्याला अहमदचा कळवळा आला तेव्हा त्याने त्याला विकत घेतले आणि उत्तर त्याच्याजवळ ५०० होन देऊन त्याला सोडून दिले. अहमदाने त्या मनुष्याच्या उदारपणाबद्दल त्याचे मनापासून आभार मानले आणि त्याच्या पाया पडून तो घरी निघाला. तो जो निघाला तो प्रथम बाजारपेठेत गेला, तेथे एका दुकानात पोपट, मैना, काकाकुवा वगैरे अनेक पशुपक्षी पिंजऱ्यात घालून विकण्याकरिता ठेवले होते. दुकानदाराजवळून त्याने सर्व पक्षी विकत घेतले आणि लागलीच त्यांना सोडून दिले हे त्याचे चमत्कारिक दिसणारे कृत्य पाहून दुकानदार त्यास विचारतो. काय हो, तुम्ही या पक्ष्यांना हौसेने पाळण्यांचे सोडून देऊन त्यांना सोडून का वरं दिले? अहमद म्हणाला, 'शेटजी तुम्हाला गुलामगिरीचा खडतर अनुभव नाही म्हणून तुम्ही असं विचारता, मी गुलामगिरीत संबंध जन्म काढला आहे. तुम्ही या पक्ष्यांचा जन्मसिद्ध हक्क हिरावून घेत आहात, हे मलापहावेना. म्हणून मी त्यांना सोडून दिले ! हे ऐकून दुकानदाराचे तोंड बंद झाले → सुविचार सत्य आणि न्याय याहून कोणताही धर्म मोठा नसतो. म. गांधी ● जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वतःला स्वांतत्र्यात राहण्याचा अधिकार नाही अब्राहम लिंकन • दिव्याने दिवा लावत गेलां कि दिव्याची एक माळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं कि फुलांबी माळ तयार होते. माणसाला माणूस जोडत गेलं कि माणूसकीचं एक सुंदर जग तयार होते. आणि शब्दाला शब्द जोडत गेलं कि साहित्यकृती तयार होते उत्तम.

दिनविशेष
'वंदेमातरम' चे जनक बंकिमचंद्र चटर्जी जन्मदिन १८३८ बंकिमचंद्र चटर्जी आजही ओळखले जातात ते 'वंदेमातरम' या आपल्या राष्ट्रगीताचे जनक म्हणून बंकिमचंद्रांनी लिहिलेली ही एकमेव कविता, त्यांच्या आनंदमठ कादंबरीत शब्दांकित झाली आहे. बंकिमचंद्र आधुनिक बंगाली साहित्याचे एक प्रवर्तक होते. विद्यार्थीदशेतच सुरु झालेले त्यांचे लेखन जीवनाच्या अखेरपर्यंत सतत सुरु होते. ते एक अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. १८५८ मध्ये कलकत्ता विद्यापीठातून जे पहिले दोन पदवीधर बाहेर पडले. त्यात बंकिमचंद्र होते. त्यानंतर डेप्युटी मॅजिस्ट्रेट झाले व सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी विविध सरकारी हुद्यांवर काम केले. १८७२ साली त्यांनी बंगदर्शन हे बंगाली नियतकालीक सुरु केले. सुशिक्षितात स्वातंत्र्यप्रेम आणि राष्ट्राभिमान जागा करण्याच्या हेतूने सुरु केलेल्या या नियतकालिकामुळे बंगाली नियतकालिकाचे प्रभावी पर्व सुरु झाले. अनेक नवे लेखक यामुळे उद्यास आले. रवींद्रनाथांनाही बंकिमचंद्रांनी साहित्यसाधनेसाठी प्रोत्साहन दिले शुध्द भाषा व बोली भाषा याचा सुंदर संगम करुन बंकिमचंद्रांनी बंगाली गधाला नवे वळण लावले व सामर्थ प्राप्त करून दिले आपली पहिली कादंबरी इंग्रजीत लिहीली. पहिली बंगाली कादंबरी दुर्गेशनंदिनी ही असून नंतर त्यांनी कुंड मृणलिनी, विषवृक्ष, चंद्रशेखर आनंदमठ इ. अनेक कादंबऱ्या लिहील्या बंगाली साहित्यात विनोदही बंकिमचद्रांनीच आणला कमलकातेर दप्तर म विनोदगर्भ वैचारिक लेखही प्रसिद्ध आहेत. २५ जून १९३८ रोजी त्यांची जन्मशताब्दी मोठ्या प्रमाणावर बंगालमध्ये साजरी केली गेली होती. (मृत्यू ८ एप्रिल १८९४)

मूल्ये स्वाधीनता, कर्तव्यदक्षता → अन्य घटना • इंग्लंडमध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करून भारताने विश्वचषक जिंकला - १९८३
उपक्रम
सुप्रसिद्ध बंगाली लेखकांची व त्यांच्या पुस्तकांची नावे मिळवून फलकावर लिहा. समूहगान जहाँ डाल डाल पर सोने की चिडीयाँ करती हैं बसेरा

सामान्यज्ञान
• राम गणेश गडकरी- गोविंदाग्रज
• कृष्णाजी केशव दामले- केशवसुत
• वि.वा. शिरवाइकर- कुसुमाग्रज,
• प्रल्हाद केशव अत्रे- केशवकुमार ●त्र्यंबक बापूजी ठोंबरे - बालकवी
●नारायण मुरलीधर गुप्ते. बी.

No comments:

Post a Comment