Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday, 23 March 2021

संस्कारमोती( सुविचार, बोधकथा, दिनविशेष, सामान्यज्ञान)

 दिनांक १९ मार्च



सुविचार-

आपल्याला जीवनात सर्वोच्च सामर्थ्य मिळवायचे असेल तर आत्मसन्मान, आत्मज्ञान आणि आत्मानियत्रण या तीन गोष्टींची जरुरी असते. 


कथाकथन

कवीच कैवारी 

: दिल्लीतील एका श्रीमंताने, एका नामवंत पण जायने अमत लाक असत! परिस्थितीने गरीब असलेल्या कवीच्या काळागायनाचा कार्यक्रम आपल्या घरी ठेवला. कार्यक्रम अत्यंत बहारदार झाला. पण तो कंजष धनिक त्या कवीला म्हणाला, 'तुम्ही उद्या माझ्याकडे या मी उद्या तुम्हाला चांगली बिदागी देईन.' दणदणीत बिदागी मिळण्याच्या आशेने दुसऱ्या दिवशी तो कवी त्या धनिकाकडे गेला असता तो धनिक त्याला म्हणाला, 'कविराज तुम्ही तुमच्या काव्यगायनाने जरी काही काळ आम्हाला आनंद दिलात तरी प्रत्यक्षात तुम्ही मला काहीच दिलेले नाही ना?' त्याचप्रमाणे मीसुध्दा तुम्हाला मोठी बिदागी देण्याचे आश्वासन देऊन काही काळ आनंद दिला असल्याने आता प्रत्यक्ष विदागी देण्याची काही गरज नाही. धनिकाचे हे बोलणे ऐकून निराश झालेल्या कवीने ती गोष्ट आपल्या मित्राच्या कानी घातली. त्या मित्राचे व बिरबलाचे स्नेहसंबंध असल्याने त्याने तो प्रकार बिरबलाच्या कानी घातला. त्यावर बिरबल त्याला म्हणाला, 'एक आठवड्याचे एकाच दिवशी व एकाच वेळी तू मला व या कवीराजाना तुझ्या घरी जेवावयाला बोलव आणि आम्हा दोघांना जेवायला बोलावल्याचे न सांगता तू त्या धनिकालाही त्याच वेळी जेवायला येण्याचे आमंत्रण कर. तुझ्याकडे आल्यावर तू फक्त मला व या कवीराजांना जेवायला वाढ. त्या श्रीमतांना वाढू नकोस. पुढे काय करायचं, ते मी पाहून घईन. बिरबलाने सांगितल्याप्रमाणे त्या मित्राने त्या तिघांनाही एकाच दिवशी व एकाच निमंत्रण दिले. बिरबल व कवी थोडेसे लवकर गेले. त्यांच्या मित्राने त्या दोघांना उत्तमपैकी जेवण वाढले. ते दोघे जेवत असतानाच तो श्रीमंत मनुष्यही त्या घरी गेला, पण यजमानाने मुद्दाम त्याला जेवण तर वाढले नाहीच, पण त्याचे साधे स्वागतही केले नाही. बिरबल व कवी यांचे जेवण आटोपले तरी यजमान आपल्याला जेवण वाढण्याची काहीच हालचाल करीत नाहीसे पाहून तो श्रींमत माणूस त्याला रागाने म्हणाला. 'तुम्ही मला जेवणाचे निमंत्रण करूनही जेवायला वाढत नाही ही गोष्ट सभ्यतेला धरून आहे काय?' बिरबलाने विचारले, मग या कवीराजांना तुम्ही उद्या माझ्या घरी या, म्हणजे तुम्हाला चांगली बिदागी देतो असे सांगून, ते तुमच्याकडे आले असता तुम्ही त्यांना तसेच परत पाठवलेत, ही गोष्ट तरी सभ्यतेला धरून होती काय?' बिरबलाच्या या प्रश्नाने तो श्रीमंत मनुष्य पुरता शरमला. त्याने केलेल्या अपराधाबद्दल त्या कवीची क्षमा मागितली व तिथल्या तिथे त्याला पुरेशी बिदागी दिली. मग यजमानाने त्या श्रीमंताची क्षमा मागून त्याला पोटभर जेवू घातले.



दिनविशेष

      राजा केळकर संग्रहालय राष्ट्राला अर्पण (१९६२) : राजा केळकर ऐतिहासिक वस्तुसग्रहालय है केवळ पुण्याचेच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राचे भूषण आहे. पुण्याचे एक नागरिक दिनकर गंगाधर केळकर यांच्या छांदिष्ट वृत्तीतून, अथक परित्रमातून आणि भगीरथ प्रयत्नातून ते साकारले आहे. इतिहासाची विलक्षण ओढ, रसिकता, संचयवृत्ती यामुळे त्यांना हा आगळा वेगळा छद जडला. जुन्या काळच अडकित्ते, गंजिफा, लामणदिवे, वेगवेगळ्या घाटाची कलाकुसरीची, जुन्या वळणाची भांडी, वस्तू या साऱ्यांचा संग्रह करण्याचा नाद त्यांना जडला. संग्रह करण्यातला, जुन्या दुर्मिळ चीजवस्तू गोळा करण्यातला आनंद त्यांना कळला. या छंदाचे इतरांकडून कौतुक व्हायला लागल्वावर कामाचा झपाटा वाढला. नंदादीप, समया, पणत्या, टांगते दिवे, पानदानाचे डबे, विविध वाद्ये, चित्रे आदि वस्तूंची भर पडत गेली. वस्तुसंग्रहाला घर अपुरे पड़् लागले. जिद्द, उत्साह दुणावल्याने केळकरांनी वस्तुसंग्रहालयाचे स्वप्न साकारण्यासाठी इतरांची मदत घ्यायला सुरूवात केली. १९ मार्च १९६२ पासून राजा दिनकर केळकर या नावाने वस्तुसंग्रहालय लोकांना पाहण्यासाठी खुले झाले. व्यवस्थापन केळकरांचे व देखभाल खर्च महाराष्ट्र सरकारचा अशी व्यवस्था ठरली. १२ एप्रिल १९७५ पासून महाराष्ट्र शासनाकडे मालकी आली.


सामान्यज्ञान -

       पक्षी निरीक्षण करताना सूर्याकडे पाठ असावी.त्यामुळे पक्ष्यांचे सारे चित्रविचित्र रंग स्पष्ट दिसतात. संगीताला बैठक लागते, तशीच पक्षी निरीक्षणालाही बैठक आवश्यक आहे. ०वाऱ्यावर चालणाऱ्या पवनचक्क्या चांगल्या चालण्यासाठी आणि त्यांच्या उपयोगासाठी ताशी बारा ते पंधरा किलोमीटर एवढा वाऱ्याचा वेग अपेक्षित असतो.

No comments:

Post a Comment