सदाचार व ज्ञान
एकदा गौतमबुद्धाच्या ज्ञानसभेत सर्वश्रेष्ठ कोण अशी चर्चा सुरु झाली. त्या वेळेस शोणदण्ड नावाचा एक माणूस तेथे उपस्थित होता. तो म्हणाला, “तेजस्वी, कुलीन, सदाचारी व ज्ञानी व्यक्ती सर्वश्रेष्ठ असते.” बुद्ध - ही सर्वच्या सर्व लक्षणे आवश्यक आहेत का खरच? शोणदण्ड - तेजस्वी नसेल तरी मनुष्य श्रेष्ठ असू शकतो? बुद्ध - उरलेले तीन गुण अगदी अपरिहार्य आहेत का? शोणदण्ड - कुलीनता नसली तरी चालू शकेल. त्य अडकत पंखदेख पडले. अशा तर तिला एक बुद्ध - सदाचार व ज्ञान यांतील एखादी गोष्ट नसेल तर? शोणदण्ड - त्या परिस्थितीत ज्ञान व सदाचार एकमेकांना पूरक व पोषक आहेत. ज्ञानाविना सदाचार व सदाचाराविना ज्ञान विशुद्ध असू शकणार नाही. ज्यांच्या जीवनात सदाचार व ज्ञान, प्रज्ञा व शील यांचा समन्वय असतो, तेच श्रेष्ठ व महान बनतात. त्या दोहोंचा संबंध काया व तिची छाया यांच्याप्रमाणे अविभाज्य आहे. ज्ञानाविना चारित्र्य म्हणजे सुराविना संगीत, सुगंधावाचून फूल, चंद्रावाचून चांदणे ठरते.
No comments:
Post a Comment