सुविचार:
जीवनाचे नंदनवन करण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे परिश्रम चिकाटी, जिद्द.
श्लोक
श्रध्दावान् लभते ज्ञान तत्परः संयतेन्द्रियः । ज्ञानं लब्बा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ 1 | श्रध्दावान मनुष्याला ज्ञान प्राप्त होते ते ज्ञान अतःकरणात उसके की शांती प्राप्त होते आणि आत्मबोध होतो.
चिंतन
तनू त्यागिता कीर्ती मागे उरावी. जन्मलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जुन्या कपड्याप्रमाणे हे शरीर सोडून जायचे आहे. मरण कुणाला टळले आहे. पण कोण किती जगता यापेक्षा तो कसा जगला हे जास्त महत्वाचे! त्याचे जीवन दुसऱ्याच्या कामी किती आले हे महत्वाचे स्वत:साठी जगणारी माणसे मरतात पण दुसन्यासाठी मरणारी मात्र मरूनही तो | रूपाने या जगात राहतात. त्याचा देह जातो पण कीर्ती राहते.
कथाकथन
संत कबीरांच्या साहित्यातील सामाजिक जाणीव-कवीराच्या काळामध्ये खूप मोठी परकीय आक्रमण झालेली दिसतात हे आक्रमक हिस्त्र प्रवृत्तीचे होते, तसेच भोगविलासीही होते. या धर्मातील उच्चवर्णीय लोक कनिष्ठ लोकांचे विविध मार्गांनी शोषण करत होते. तत्कालिन सामाजिक क्षेत्रामध्येही खूप मोठा भेदाभेद माजलेला होता. हिंदू मुस्लिमांमधील भेदाभेद तर होताच, परंतु त्याचबरोबर हिंदू धर्माच्या अंतर्गतही खूप मोठी भेदाभेदाची दरी होती, या धर्मातील उच्चवर्णीय लोक कनिष्ठ वर्णीय लोकांचे विविध क्षेत्रातील सल्लास्थानी असलेले लोक अत्यंत स्वार्थी आणि भोगवादी बनलेले होते म्हणून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात माणुसकी पायदळी तुडविली जात होती. म्हणून सामान्य माणूस अत्यंत दुःखी जीवन जगत होता. संत कबीर हे निर्भीड मनोवृत्तीचे असल्यामुळे त्यांना सत्ताधारी लोकांच्या भोगविलासी प्रवृत्तीला तीव्र विरोध केला. विविध प्रकारच्या धार्मिक कर्मकांडानी काहीही साध्य होत नाही, असे कबीराचे स्पष्ट मत होते. तीर्थयात्रा करणे, गंगेमध्ये स्नान करण माळा गळ्यात घालून भक्त म्हणून मिरविणे अशा सर्वच गोष्टी निरर्थक असल्याचे कबीर सांगतात विविध ठिकाणच्या तीर्थस्थानी देवाच्या नावाने तिथील ऐतखाऊ पुजारी लोक भोळ्याभाबड्या जनतेचे खूप मोठे शोषण करतात अशा शोषणाला समान्यजनांनी बळी पडू नये जत्रेमध्ये दगड असतो आणि तीर्य म्हणून चमचाभर पाण्याचा एकेक रुपया वसूल केला जातो अशा गोष्टींना बळी पडणे हा वेडेपणा आहे संत कबीर, संत रविदास आणि संत तुकाराम यांच्या विचारांमध्ये खूप मोठे साम्य दिसून येते. या संदर्भात संत तुकारामही तीथी घोडा पाणी देव रोकटा सनी असे म्हणतात तीर्थस्थानी नदीमध्ये स्नान केल्याने आपली सर्व पापे धुवून जातात आणि आपणाला मोक्ष मिळतो. असाही खुळा समज समाजामध्ये प्रचलित आहे. या संदर्भामध्ये संत कबीर एक मार्मिक प्रश्न उपस्थित करतात तीर्थक्षेत्रातील | नदीमध्ये स्नान केल्याने माणसाला मोक्ष मिळत असेल तर राबंदिवस त्या पाण्यातच राहणाऱ्या बेडकांना का मोक्ष मिळत नाही. तसेच मुस्लीम धर्मातील बकऱ्यांचा बळी देण्याच्या प्रथेलाही त्यांनी विरोध केला कबीरांना मानवता हा धर्मच महत्त्वाचा वाटत होता. प्रत्येक धर्मातील कर्मकांड माणयांना अंधश्रध्दाळू बनवणारे असते. गळ्यात माळा घालणे, गंध/टिळा लावणे, डोक्याचे केस कापणे, असे केवळ बाढ़ा सांग, ढोंग केल्याने माणूस साधू, संत किंवा सज्जन होत नाही, तर त्यासाठी आधी आपले मन शुद्ध करणे महत्त्वाचे आहे. टिळक, माळा परिधान केल्याने किंवा शाळीग्रामच्या पूजेने मन शुद्ध शीतल होत नाही, तर त्यासाठी आधी मनाची प्राती दूर झाली पाहिजे आणि माणसाचे वर्तन नैतिक बनले पाहिजे. संत कबीरांनी आपल्या जीवनविषयक तत्त्वज्ञानामध्ये सत्य, अहिंसा, सद्भाव, सदाचार, परोपकार, शील या गोष्टींना महत्त्व दिलेले आहे. यासारखी मानवतावादी नैतिक मूल्ये आचरणात आणण्याचा आग्रह कबीरानी आपल्या साहित्यातून धरलेला आहे. प्रेम हा तर मानवी जीवनाचा गाभा असल्याचे कबीर सांगतात. पोथी पढपढ जग मुआ, पंडित मया ना कोय कई आधार प्रेम का पड़े सो पंडित होय 'प्रेम' या शब्दाची अशी जबर माणसांच्या आचरणात आली तर मानवी जीवनातील अनेक प्रश्न सहज सुटतील.
हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेशही संत कबीरांनी अनेक ठिकाणी दिले आहे. हिंदूरक दुई महिएकै कड़े कचौर पुकारी असे म्हणतकवीरांनी हिंदू-म मधील कृत्रिम भेदभाव निरर्थक आहेमांनी आपापसातील भेदभाव विसरून माणूस म्हणून एकत्र आहे पाहिजे असा आग्रह धरता म्हणून संत कबीर हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्हीही समान गटांमध्ये अत्यंत मोठा वाटते त्यांनी आपल्या गुरु साहिया मध्ये कबीरच्या समावेश केला. सर्व प्रकारच्या भेदभावाला विरोध करणारे कधीर हिंदू धर्मातील वर्णव्यवस्थेने निर्माण केलेल्या उच्च नीचतेलाही प्रखर विरोध करवात सर्वच माणसांची उत्पत्ती एकर ज्योतीतून झाली असेल तर ब्राह्मण सूड असा भेदभाव कशासाठी करायचा? असा खडा सात कधीर विचारतात आणि मानवी समाजामध्ये उच्चनीचतेचे कृत्रिम स्तर निर्माण करणाऱ्या जातीयता मूठमाती देण्याचा प्रयत्न करतात.
→ दिनविषेश
'दादाभाई नवरोजी' (जन्म ४ सप्टेंबर १८२५ मृत्यू ३० जून १९१७ ) गृहन्मुंबईत फोर्ट विभागात दादाभाई नवरोजी मार्ग 'टाइम्स ऑफ इंडिया या भव्य इमारतीला शोभा देत आहे व त्यांचा पुतळा नवभारताची प्रगती पाहत उभा आहे. ४ सप्टेंबर १८२५ साठी पारशी त्यांचा जन्म झा १८४५बी.ए.संडनला गेले. भिकाजी कामा यांच्या कार्यात सामील झाले उद्योग शिरले. इंग्लंडमधीन भारतीयांची संघटना बांधली. इंडियन सोसायटीची स्थापना केली. त्यांच्या या सनदशीर विधायक कार्यामुळे से लोकप्रिय झाले. इंग्लंडच्या पार्लमेंटचे सदस्य म्हणून ते निवडून आले. भारताचा सम्माननीय श्रेष्ठ सदस्य म्हणून जनता त्यांना ओळखू लागली. दादाभाई राष्ट्रीय समेत सामील झाले तेव्हा भारतीय जनतेच्या समस्या इंग्रज प्रशासनाच्या उपाय सुचविणे एवढेच मर्यादित स्वरुपाचे कार्य ती संस्था करीत होती. दादाभाई हे अत्यंत लोकप्रिय व मधुर मायेये सम्राट होते. १८९६ १९०६ या दोन ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.
मूल्ये
स्वाधीनता बंधुता, समता, राष्ट्रप्रेम, निर्भयता
→अन्य घटना
दादाभाई नवरोजी स्मृतिदिन १९१७ महान संत कबीर यांची जयंती- १३०९ • भारत पाकिस्तानात कच्छ करार मिझोराम या राज्याची निर्मिती १९८६ ● रॅले जॉन विल्यम्स स्टुट स्मृतीदिन १९८६
सामान्य ज्ञान
• महाराष्ट्रात सर्वात जास्त लोखंड देऊळगाव (चंद्रपूर)
महाराष्ट्रात सर्वात जास्त मँगेनीज रामटेक (नागपूर)
• महाराष्ट्रात सर्वात जास्त दगडी कोळसा कामठी (नागपूर)
महाराष्ट्रात सर्वात जास्त बॉक्साईट (कोल्हापूर)
महाराष्ट्रात सर्वात जास्त अभ्रक (नागपूर)
महाराष्ट्रात एक प्रचंड विद्युत प्रकल्प कोयना (सातारा)
No comments:
Post a Comment