Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Saturday, 26 June 2021

27 जून, संस्कारमोती- दैनंदिन शालेय परिपाठ

           दैनंदिन शालेय परिपाठ


सुविचार
'श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा, तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल.' • 'जुलमाने विचार मरत नाहीत, उलट ते सुदृढ होत राहतात मॅझिनी

श्लोक
प्रकाश च प्रवृतिंच मोहमेव च पाण्डव न देष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानी कांक्षति ।। उदासीनवदासीनो गुणयों न विद्याल्यते । गुणा वर्तन्त इत्येष योऽयतिष्ठति नेगते ॥ बार समृदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः । तुल्यप्रियाधियो धीरस्तुत्यनिन्दात्म संस्तुतिः || मानापमानयोस्तुल्यस्तुत्यो मित्रारिपक्षयोः । सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्चते ॥ श्रीमद्भगवतगीता
- प्रकाश, प्रवृत्ति आणि मोह (म्हणजे अनुक्रमे सत्व, रज व तम या गुणांची कार्ये किंवा फले) प्राप्त झाली तरी त्यांचा जो व्देष करीत नाही, आणि प्राप्त न झाली तरी त्यांची आकांक्षा करीत नाही. (कर्म फलाबद्दल) जो उदासीनसारखा राहणारा, सत्व, रज व तम हे गुण ज्याला विचलित करीत नाहीत, गुण (आपापले) काम करीत आहेत एवढेच मानून जो स्थिर राहतो, विचलित होत नाही. म्हणजे विकार पावत नाही, जो सुखदुःखांना समान समजतो, जो स्वस्थ म्हणजे आपल्याच स्वरुपाच्या ठिकाणी स्थिर झाला. माती, दगड व सोने यांच्याकडे जो समान दृष्टीने पाहतो, प्रिय व अप्रिय आपली स्तुती ही ज्याला समसमान वाटतात सदा धैर्याने युक्त ज्याला मान व अपमान मित्र व शत्रुपक्ष तुल्य म्हणजे एकसारखे, आणि (प्रकृति सर्व करते असे समजल्यामुळे त्याने सर्व सकाम क्रमांचा त्याग केला, त्या मनुष्याला गुणातीत असे म्हणतात.

चिंतन
'धैर्यवान लोक मशालीप्रमाणे असतात.' धैर्यवान लोकांच्या जीवनाचे एकच ध्येय असते व ते म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर स्वार होणे अन्यायाच्या अंधारात मशाल होऊन घुसणे, घरातल्या थोड्याशा अंधाराला दूर करण्यासाठी दिवा लावता येतो पण त्यापेक्षा भयंकर अंधार दूर करायचा तर पाजळती मशाल हवी. मशाल उलटी घरली तरी ज्वाळा वरच झेपावते त्याप्रमाणे धैर्यवान लोकांना कितीही प्रतिकार झाला तरी त्यांचे धैर्य कधीही खालावत नाही. ते सदैव तळपतच राहते.

कथाकथन
'लोभी शेतकरी'
: रशियातल्या एका श्रीमंत शेतकऱ्याची ही गोष्ट आहे. एकदा त्याला राजाकडून असे वचन मिळाल की तो एका दिवसात जेवढं चालेल तेवढी जमीन त्याची होइल. त्यासाठी अट अशी होती की जिथून तो सुरुवात करेल त्या ठिकाणी त्याने सूर्यास्तापूर्वी परत यायचे. दुसऱ्या | दिवशी भल्या पहाटेच त्या श्रीमंत शेतकऱ्याने वेगात चालायला सुरुवात केली; कारण जास्तीत जास्त जमीन त्याला मिळवायची होती. दुपारी तो दमला तरी चालत राहिला; कारण अजून श्रीमंत व्हायची आयुष्यात एकदाच मिळणारी ही संधी त्याला घालवायची नव्हती. दुपार सरत आल्यावर घातलेली अट त्याला आठवली. जिथून सुरुवात केली तिथ सूर्यास्तापूर्वी त्याला परत जायचं होते जास्तीत जास्त जमीन मिळवायच्या लोभामुळे तो आता दूर आला होता. त्यान परतीचा प्रवास सुरु केला. त्याचं लक्ष सूर्यास्ताकड होत. सूर्यास्त जवळ येऊ लागला तसा तो अधिक जोरात पळू लागला. पळता पळता तो पूर्णपणे थकला, त्याला श्वास घेता येईना. तरीही सर्व शक्ती पणाला लावून तो पळत राहिला आणि सुरुवातीच्या ठिकाणी येऊन पोहोचला. पण तिथंच तो खाली पडला आणि मेला. तो सूर्यास्तापूर्वी मूळ जागी तर पोहोचला. राजाने त्याला सर्व जमीन दिली. त्याला पुरण्यात आलं त्यासाठी त्याला फक्त साडेतीन हात जागा लागली.

दिनविशेष
• 'शिवराम परांजपे यांचा जन्मदिन १८६४ शि.म.परांजपे यांना त्यांच्या नावापेक्षा लोकांनी ओळखले ते 'काळ' कर्ते म्हणूनच ते | राष्ट्रीय बाण्याचे साहित्यिक, पत्रकार व फर्डे वक्ते होते. महाराष्ट्रात 'काळ' या वृत्तपत्राव्दारे देशाभिमानाची धगधगती ज्योत त्यांनी जनमानसात पेटविली. || शुध्द स्वातंत्र्याचे प्रतिपादक म्हणून त्यांनी 'काळ' या वृत्तपत्रातून आपला ठसा उमटविला. काळमधील लेख इतके प्रक्षोभक असत की इंग्रज सरकार ते जप्त करीत असे. त्यांचे निवडक लेख 'काळातील निवडक लेख' या नावाने प्रसिध्द आहेत. मानाजीराव हे नाटक; विंध्याचल, गोविंदाची गोष्ट या कादंबऱ्या आणि |'मराठ्यांच्या लढ्यांचा इतिहास' हा ग्रंथ असे त्यांचे सकस साहित्य आहे. ब्रिटिश सरकारने 'काळ' वृत्तपत्रावर जामीनकीची कुऱ्हाड चालवून ते बंद पाडल्यामुळे या प्रतिभावंताची प्रतिभा कुस्करली गेली. पुढे त्यांनी 'स्वराज्य' वृत्तपत्र काढले पण त्यात काळाचा आवेश आणि आग नव्हती. लो. टिळकांच्या निधनानंतर म. गांधींच्या मार्गाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण त्यात ते मनापासून रमले नाहीत. १९२९ साली बेळगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. नंतर प्रकृती खालावत गेली व २७ सप्टेंबर १९२९ साली ते कालगत झाले. काळातील तेजस्वी निबंधाचे जनक म्हणून त्यांची कती मात्र काळावर मात करून अजरामर झाली आहे.

मूल्ये
स्वाधीनता, कर्तव्यदक्षता, राष्ट्रप्रेम, बंधुता, निर्भयता.

अन्य घटना
शूर मराठा सेनापती धनाजी जाधव स्मृतिदिन १७१०.
• महाराजा रणजीतसिंहाचे निधन १८३९ • अंधत्वावर मात करून महान कर्तृत्व गाजवणारी अमेरिकन महिला हेलन केलर हिचा जन्म १८८०

समूहगान
बालवीर हो सज्ज होऊ या, गात गात ताल घेत मार्ग काढू या...

उपक्रम

→ महाराष्ट्रातील वेगवेगळी वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यांच्या जोड्या दाखवणारा तक्ता तयार करा.

सामान्यज्ञान
• सर्वात मोठा खंड आशिया.
• सर्वात मोठे बेट ग्रीनलँड.
• सर्वात मोठा सागर पॅसिफिक
• सर्वात मोठे वाळवंट सहारा,
• सर्वात मोठा ग्रह ज्युपिटर
• सर्वात लांब नदी नाईल.

No comments:

Post a Comment